Chanakya Niti | या प्रकारच्या व्यक्तींचं स्वत:चं अस्तित्व नसते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

नीतिशास्त्रांतील गोष्टी लोकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत, लोक त्याच्या धोरणांचे अनुसरण करतात आणि जीवनाच्या मार्गावर चालतात. या ग्रंथात जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबींचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंद आणि समाधान मिळते.

Chanakya Niti | या प्रकारच्या व्यक्तींचं स्वत:चं अस्तित्व नसते, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya-Chanakya
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 8:11 AM

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ते केवळ एक विद्वान नव्हते तर एक उत्तम शिक्षक देखील होते. लोक अद्यापही त्यांनी दिलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवतात. त्यांचे शिक्षण तक्षशिला विद्यालयात झाले आणि तेथील मुलांना त्यांनी शिक्षक म्हणूनही शिकविले. आचार्य चाणक्य यांनी आपल्या कुशल युक्तीने नंद वंश संपवून चंद्रगुप्तला सम्राट बनवले. एवढेच नव्हे तर त्यांनी आयुष्यातील अर्थशास्त्र, नीतिशास्त्र यासह अनेक ग्रंथ लिहिले (These Types Of People Has No Goal And Vision In Life According To Acharya Chanakya In Chanakya Niti).

त्याच्या नीतिशास्त्रांतील गोष्टी लोकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत, लोक त्याच्या धोरणांचे अनुसरण करतात आणि जीवनाच्या मार्गावर चालतात. या ग्रंथात जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबींचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंद आणि समाधान मिळते.

आचार्य चाणक्य नीतीशास्त्रात अशा व्यक्तींबद्दल सांगितले जे लवकरच नष्ट होतात. या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांचे कोणतेही अस्तित्व नसते. त्यांच्याबाबत जाणून घ्या –

नदीकाठावरील झाडे

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार नदी काठावरील झाडे प्रथम नष्ट होतात. कारण जेव्हा नदीचा प्रवाह वाढत असतो तेव्हा सभोवतालच्या गोष्टी प्रथम वाहतात. याचा अर्थ असा आहे की नदीच्या प्रावाहापासून नेहमी दूर रहावे.

इतरांच्या घरात राहणारे लोक

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे दुसऱ्यांच्या घरात राहतात त्यांचे स्वतःचे अस्तित्व नसते. ते इतरांवर अवलंबून राहून जगतात. म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचा लवकरच नाश होतो. या लोकांचा समाजात कधीही आदर मिळत नाही.

विना मंत्री असलेला राजा

आचार्य चाणक्य यांच्या मते, मंत्री नसल्यास राजाचा सर्वात लवकर नाश होतो. कारण मंत्री राजाला सर्वात जास्त सल्ले देतात. मंत्र्याशिवाय राजा दिशाहीन असतो. कारण मंत्रीच त्याला राजाबद्दल माहिती देतात. त्यांच्या मते, असे लोक राजा बनू शकत नाहीत.

These Types Of People Has No Goal And Vision In Life According To Acharya Chanakya In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | भाग्यवान असतात ते ज्यांच्याकडे या 5 गोष्टी असतात

Chanakya Niti | देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा, घरात धन-धान्याची कमतरता भासणार नाही