भगवान बुद्धाच्या या गोष्टी दुर करेल तुमच्या मनातील प्रत्येक शंका… जाणून घ्या, शांतीपूर्ण जिवनासाठी काय शिकवण दिली आहे बुद्धांनी

| Updated on: May 14, 2022 | 2:14 PM

बुद्ध पौर्णिमा 2022: भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या गोष्टी प्रत्येक शंका दूर करतात, भगवान बुद्धांच्या शिकवणींना ते प्रमांणित उत्तर देतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. ते सत्य आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे शब्द भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवतात. मुख्य बातम

भगवान बुद्धाच्या या गोष्टी दुर करेल तुमच्या मनातील प्रत्येक शंका... जाणून घ्या, शांतीपूर्ण जिवनासाठी काय शिकवण दिली आहे बुद्धांनी
भगवान बुद्धाच्या या गोष्टी दुर करेल तुमच्या मनातील प्रत्येक शंका...
Image Credit source: twitter
Follow us on

१६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. यानिमित्ताने भगवान बुद्धांचे वचन वाचून मनातील सर्व गोंधळ शांत होऊ शकतात. भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी एका राजघराण्यामध्ये झाला होता, त्यांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. त्याच्या जन्माच्या वेळी एका ज्योतिषाने भाकीत (Astrologically predicted) केले होते की हे मूल मोठे होऊन मोठा धर्मगुरू होईल. ही भविष्यवाणी खरी ठरली आणि वयाच्या 27 व्या वर्षी राजकुमार सिद्धार्थने राजेशाहीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी बिहारमधील बोधगया येथे एका वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती (Enlightenment under the banyan tree) केली आणि त्यानंतर ते सिद्धार्थापासून गौतम बुद्ध झाले. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असे म्हणतात. म्हणूनच दरवर्षी हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Pournima) आणि बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो.

बुद्धानेच बौद्ध धर्माचा पाया घातला होता. गौतम बुद्ध हा नारायणाचा नववा अवतार मानला जातो. आज त्याचे जगभरात अनुयायी आहेत. १६ मे रोजी बुद्ध जयंती आहे. या निमित्ताने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक शंका दूर होऊ शकते. भगवान बुद्धांचे मौल्यवान शब्द जीवनातील कोणतेही उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या प्रकारे पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे.

• स्वतःवर विजय मिळवा – आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. जर तुम्ही असे केले तर विजय नेहमीच तुमचाच असेल, तो तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

हे सुद्धा वाचा

• इतरांसोबत आनंद वाटा – एका जळत्या दिव्याने हजारो दिवे पेटू शकतात ज्याला मर्यादा नाही. तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटून आनंद कमी होत नाही तर तो अधिकच वाढतो.

• चांगले विचार अंगीकारा – आयुष्यात पाहिजे तितकी चांगली पुस्तके वाचा, कोणतेही चांगले शब्द ऐका, परंतु जोपर्यंत तुम्ही ती तुमच्या आयुष्यात अंगीकारली नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही.

• ज्ञान संपन्न बना – अज्ञानी असणे म्हणजे बैलासारखे आहे, जे फक्त आकाराने मोठे आहेत, परंतु त्यांच्या मनात कोणतीही वाढ नाही. वाईटाचा वाईटाने कधीच अंत होत नाही. द्वेषाचा अंत फक्त प्रेमानेच होऊ शकतो, हे अटळ सत्य आहे.

• आपला मार्ग स्वतः च निवडा – आपल्याला आपला मार्ग स्वतःच बनवावा लागेल, कारण आपण या जगात एकटेच आलो आहोत आणि आपल्याला एकटेच जायचे आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपले नशीब स्वतःच घडवावे लागते.

• रागावर नियंत्रण ठेवावे – नेहमी रागावण्याची सवय म्हणजे जळता कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासारखे आहे. हा राग तुम्हाला आधी जाळतो. जर आपण आपल्या समस्येवर उपाय शोधू शकलो तर काळजी करण्याची काय गरज आहे आणि जर समस्येवर तोडगा नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

• कुणाची हत्या करू नये – प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते. सर्व प्राणिमात्रांना आपले मानावे आणि कोणत्याही सजीवाची हत्या करू नये. इतरांनाही असे करण्यापासून रोखावे.