AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका सप्टेंबर महिन्यात होत आहे. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे असलं तरी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामने होणार आहे. असं असताना या मालिकेमुळे बांगलादेशला फटका बसला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 12, 2026 | 10:25 AM
Share

India vs Afghanistan Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं असून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात ही स्पर्धा पार पडेल. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे हे विशेष… या मालिकेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला फायदा होणार आहे. तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा पुन्हा एकदा हिरमोड होईल. कारण भारतीय बांग्लादेश दौऱ्यावर जाणार नाही, हे या वेळापत्रकावरून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता शक्यता संपली असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 11 ऑगस्टला टी20 मालिकेची घोषणा केली. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या. कारण भारतीय संघाने बांग्लादेश दौरा करावा यासाठी बीसीबी पूर्ण जोर देत होती. इतकंच काय तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतासाठी 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यानचा कालावधीही निश्चित केला होता. या दरम्यान, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळण्याची योजना होती. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टी20 वेळापत्रक जाहीर होताच बांगलादेशचा तिळपापड झाला आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाचं बांग्लादेश दौऱ्यावर जाणं शक्यच नाही.

सलग तिसऱ्या वर्षी मालिका टाळली?

बांग्लादेश क्रिकेट बोर्ड मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या संभाव्य दौऱ्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून वारंवार विनवण्या केल्या जात आहे. बांग्लादेश बोर्डाचे अध्यक्ष माजी स्टार फलंदाज तमीम इकबाल यांनी देशाच्या सरकारसोबतही वार्तालाप केला. भारत सरकार आणि बीसीसीआयला या दौऱ्यासाठी विनवणी करण्याची विनंती त्यांनी सरकारपुढे ठेवली. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याबाबत काहीच म्हंटलेलं नाही. तसेच प्रस्तावही बांग्लादेश क्रिकेट बोर्डासमोर ठेवलेला नाही. त्यामुळे सलग तिसर्‍या वर्षी बांगलादेशचा प्रयत्न अयशस्वी ठरली आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्ये क्रिकेट दौऱ्याबाबत धुराळा उडाला होता.

भारत बांग्लादेश क्रिकेटला वादाची किनार!

बांगलादेशमध्ये 2024 नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. राजकीय उलथापालथीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. इतकंच काय तर बांगलादेशमधील अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना तेथे पाठवणे जोखमीचे मानले जात आहे. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2026 दरम्यान बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुकारून भारतात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांग्लादेश दौरा वारंवार पुढे ढकलला जात किंवा टाळला जात आहे.

Follow Us
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद