AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताटात तीन पोळ्या एकत्र का वाढू नये, ‘हे’ आहे यामागचे कारण

अनेकांना यामागचे कारण माहिती नसते मात्र तरी अनेक जण ही गोष्ट कटाक्षाने पाळतात. या मान्यतेमागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ताटात तीन पोळ्या एकत्र का वाढू नये, 'हे' आहे यामागचे कारण
भारतीय जेवणImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 29, 2023 | 7:21 PM
Share

मुंबई, अनेक भारतीय कुटुंबांमध्ये असे मानले जाते, की एका ताटात तीन पोळ्या  कधीही वाढू नयेत. फक्त पोळीच नाही तर कोणताही पदार्थ ताटात वाढताना तीन संख्येत वाढला जात नाही. अनेकांना यामागचे कारण माहिती नसते मात्र तरी अनेक जण ही गोष्ट कटाक्षाने पाळतात. या मान्यतेमागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अंकशास्त्रानुसार (Three in Numerology) धार्मिक कार्यात तीन अंक चांगले मानले जात नाहीत. दुसरीकडे, श्रद्धेनुसार, पूजेत किंवा सामान्य जीवनातही तीन गोष्टींना दूर ठेवले पाहिजे, जेणेकरून त्याचा वाईट प्रभाव कमी होईल.

हे आहे मुख्य कारण

  1. असेही मानले जाते की मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन पोळ्या कधीच वाढत नाही.
  2. असे मानले जाते की, जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण शरीराचे वजन समान आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे. एक वाटी वरण, 50 ग्रॅम तांदूळ, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी हा आहार सर्वोत्तम मानला जातो.
  3. भारतीय खाद्य संस्कृतीत पोळ्यांना विशेष महत्व आहे. याशिवाय काही धार्मिक समजुती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षानुवर्षे पाळल्या जात आहेत.
  4. तीन पोळ्या एकत्र न खान्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. अनेकांनी यामागे काही अंधश्रद्धा जोडल्या आहेत जे अत्यंत चुकीचे आहे. हा सर्वस्वी प्रत्येकाच्या मान्यतेचा प्रश्न आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.