AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Puja: तुळशीला जल अर्पण करणाऱ्यांनी चुकूनही करू नये ‘हे’ काम!

हिंदू धर्मामध्ये तुळशीला (Tulsi) शुभ आणि पवित्र मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक रोज तुळशीला जल अर्पण (offer water) करतात. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता (religion belief) आहे. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. असे म्हटले जाते की, जे लोक तुळशीचे रोप घरात ठेवतात, त्यांना माता लक्ष्मीसह […]

Tulsi Puja: तुळशीला जल अर्पण करणाऱ्यांनी चुकूनही करू नये 'हे' काम!
| Updated on: Jun 20, 2022 | 2:19 PM
Share

हिंदू धर्मामध्ये तुळशीला (Tulsi) शुभ आणि पवित्र मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक रोज तुळशीला जल अर्पण (offer water) करतात. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता (religion belief) आहे. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. असे म्हटले जाते की, जे लोक तुळशीचे रोप घरात ठेवतात, त्यांना माता लक्ष्मीसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. शास्त्रात तुळशीला जल अर्पण करण्यासाठी काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की, तुळशीशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर ते खूप अशुभ परिणाम देऊ शकते. चला जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यावी.

  1. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने लक्ष्मीचा कोप होतो, असे मानले जाते. त्यामुळे जीवनात सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते अशीही मान्यता आहे.
  2. तुळशीला जल अर्पण करताना विशेष नियम सांगण्यात आले असून त्यानुसार तुळशीमातेला जल अर्पण करताना शिवण न घालता कपडा घालावा.
  3. मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण केले जात नाही. कारण या दिवशी तुळस भगवान विष्णूची उपवास ठेवते.
  4. तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य आणि उत्तम वेळ सूर्योदयाची आहे असे म्हणतात. अशावेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष फायदा होतो. अशी मान्यता आहे.
  5. तुळशीमध्ये जास्त पाणी दिले जात नाही. कारण जास्त पाण्यामुळे तुळशी सुकते. तुळस सुकणे हे चांगले लक्षण नाही.

या दिशेला ठेवू नका तुळशी वृंदावन

धार्मिक मान्यता आणि वास्तुशास्त्रानुसार तुळशीला कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. या दिशेला तुळशी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच या दिशेला तुळशी ठेवल्याने आरोग्यासंबंधी नुकसान होऊ शकते.

या गोष्टींची घ्या विशेष काळजी

तुळशीचे रोप घराच्या छतावर नसावे असे म्हणतात. कारण यामुळे घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय तुळशीसोबत कोणतेही काटेरी रोप लावू नये. ते अशुभ मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल.
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार.
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.