AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Amavashya 2023 : विवाहीत स्त्रियांसाठी वैषाख अमावस्या का मानली जाते विशेष? या दिवशी अवश्य करा हे काम

शाख अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, व्रत, वटवृक्षाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. यावर्षी वैशाख अमावस्या 19 मे रोजी येत आहे. जाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाईल.

Vaishakh Amavashya 2023 : विवाहीत स्त्रियांसाठी वैषाख अमावस्या का मानली जाते विशेष? या दिवशी अवश्य करा हे काम
अमावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 07, 2023 | 1:05 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. वैशाख महिन्याची अमावस्या (Vaishakh Amavashya 2023) खूप खास असते कारण या दिवशी एक नव्हे तर तीन खास प्रसंग येतात. शनि जयंतीही वैशाख अमावस्येला येते आणि या दिवशी विवाहित महिला वट सावित्री व्रत पाळतात. वैशाख अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, व्रत, वटवृक्षाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. यावर्षी वैशाख अमावस्या 19 मे रोजी येत आहे. जाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. या दिवशी शनी जयंतीही साजरी केली जाणार आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, याशिवाय शनिदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचाही आशीर्वाद असतो.

ज्येष्ठ अमावस्या 2023 कधी आहे

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सात जन्मांची पापे धुतले जातात. याशिवाय या दिवशी अवश्य करावे, यामुळे पितर प्रसन्न होतात. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथी 18 मे 2023 रोजी रात्री 9.42 वाजता सुरू होईल आणि 19 मे 2023 रोजी रात्री 9.22 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 19 मे, शुक्रवार हा ज्येष्ठ अमावस्या मानला जाईल.

  • ज्येष्ठ अमावस्येला स्नानाची वेळ – सकाळी 05.15 ते दुपारी 04.59
  • वट सावित्री पूजा मुहूर्त – सकाळी 05.43 ते 08.58 पर्यंत
  • शनि जयंतीला शनिदेव पूजा मुहूर्त – संध्याकाळी 06.42 ते 07.03 पर्यंत

ज्येष्ठ अमावस्येला हे काम अवश्य करावे

  • वैशाख अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी, जलाशय किंवा तलावात स्नान करावे. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • अमावास्येच्या दिवशी वाहत्या पाण्यात काळे तीळ वाहण्याने अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते.
  • पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करणे आणि गरिबांना दान करणे यासाठीही अमावस्येचा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर दान करावे.
  • वैशाख अमावस्येच्या दिवशी विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी यमदेवतेची पूजा करावी.
  • शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी झाला. शनि जयंतीला शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे वस्त्र आणि निळे फुले अर्पण करा. शनि चालिसाचा जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
"लोकशाही अमान्य असलेले पळपुटे"
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल:
शिंदे गटाची धाकधूक वाढली; कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला...
शिंदे गटाची धाकधूक वाढली! कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला सुरुवात, कोर्टात काय काय घडतंय?
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?