AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varlakshmi Vrat : जीवनातल्या प्रत्त्येक समस्येला दूर करते वरलक्ष्मी व्रत, महत्त्व आणि पौराणिक कथा

श्रावण महिन्याच्या शुक्रवारी हे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या वरलक्ष्मी रूपाची पूजा केली जाते. वरलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

Varlakshmi Vrat : जीवनातल्या प्रत्त्येक समस्येला दूर करते वरलक्ष्मी व्रत, महत्त्व आणि पौराणिक कथा
वरलक्ष्मीImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 24, 2023 | 4:26 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात दरवर्षी अनेक सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. उद्या 25 ऑगस्ट 2023 रोजी वरलक्ष्मी व्रत (Varlakshmi vrat 2023) पाळले जात आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पती आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. श्रावण महिन्याच्या शुक्रवारी हे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या वरलक्ष्मी रूपाची पूजा केली जाते. वरलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येते. माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीचे धन आणि धान्य नेहमी भरलेले असते. या व्रताची कथा ऐकल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. या व्रताला दक्षिण भारतात विशेष मान्यता आहे.

वरलक्ष्मी व्रत कथा आणि महत्व

धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान शिवाने माता पार्वतीला वरलक्ष्मी व्रताची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. या आख्यायिकेनुसार मगध देशात कुंडी नावाचे एक नगर होते. येथे चारुमती नावाची एक स्त्री राहत होती, जी देवी लक्ष्मीची निस्सीम भक्त होती. चारुमती दर शुक्रवारी माता लक्ष्मीसाठी व्रत करत असे. त्याच वेळी ती नियमानुसार पूजा करत असे. एकदा माता लक्ष्मी चारुमतीच्या स्वप्नात प्रकट झाली आणि तिला सावनच्या शेवटच्या शुक्रवारी वरलक्ष्मी व्रत करण्यास सांगितले.

चारुमतीने लक्ष्मीच्या आज्ञेनुसार उपवास केला. चारुमतीची पूजा पूर्ण झाल्यावर माता वरलक्ष्मीच्या आशीर्वादाने तिचे भाग्य उजळले. चारुमतीचे घर ऐश्वर्याने भरले होते.  सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढवलेले होते. यानंतर शहरातील सर्व महिलांनी हे व्रत पाळले, त्यामुळे त्यांना शुभ गोष्टी मिळाल्या आणि त्यांचे घर परिपूर्ण झाले. त्या शहरात राहणाऱ्या लोकांना कशाचीच कमतरता भासली नाही. त्यानंतर दक्षिण भारतात या व्रताचा ट्रेंड वाढला आणि हा उपवास संपत्ती आणि धनधान्य देणारा मानला गेला.

वरलक्ष्मी व्रत शुभ मुहूर्त

  • सिंह लग्न पूजा मुहूर्त सकाळी 05.55 ते 07.42.
  • वृश्चिक आरोही पूजा मुहूर्त 12.17 PM – 02.36 PM.
  • कुंभ लग्न पूजा मुहूर्त संध्याकाळी 06.22 – रात्री 07.50 पर्यंत.
  • वृषभ लग्न पूजा मुहूर्त मध्यरात्री 10.50 – 12.45 पहाटे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.