Vastu and health | आजच दोषमुक्त करा वास्तूदोष, नाहीतर आजारांनी वेढा घातलाच म्हणून समजा

| Updated on: Nov 11, 2021 | 8:29 AM

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक जण नेहमी प्रयत्न करत असतो. या गोष्टीचा विचार करताना घर बांधताना वास्तू नियमांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ते तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात.

Vastu and health | आजच दोषमुक्त करा वास्तूदोष, नाहीतर आजारांनी वेढा घातलाच म्हणून समजा
vastu-and-health-
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्राचा संबंध आपल्या सुख, समृद्धी आणि सौभाग्याशी असतो. घरांची स्वप्न पूर्ण करताना आपल्याला वास्तूच्या नियमांकडे दर्लक्ष करुन चालत नाही. वास्तूनुसार बांधलेल्या घरात राहणाऱ्यांना जीवनाशी संबंधित सर्व सुख प्राप्त होते. दुसरीकडे, वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या वास्तुदोषांमुळे माणसाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि त्याला सर्व प्रकारच्या अडथळ्यांसह मोठ्या आणि असाध्य आजारांचा सामना करावा लागतो. त्याला अपयश आणि नुकसान सहन करावे लागते. चला जाणून घेऊया घराशी संबंधित वास्तुदोष तुमच्या आरोग्यासाठी कसे घातक ठरू शकतात.

1 वास्तूनुसार, कोणत्याही इमारतीचा नैऋत्य भाग म्हणजेच नैऋत्य कोन पृथ्वीच्या घटकाशी संबंधित असतो. अशा परिस्थितीत ही दिक्षा उघडी किंवा रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते , ही दिक्षा खुली असल्यास घरातील लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या वास्तुदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये अनेकदा तणाव, निराशा आणि राग निर्माण होतो.

2 वास्तूनुसार घराचा नैऋत्य भाग इतर भागांपासून वेगळा राहीला तर घरात राहणाऱ्या लोकांना मधुमेह , चिंता, गरजेपेक्षा जास्त जागरुक राहणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

3 वास्तूनुसार घराचा ईशान्य भाग जल तत्वाशी संबंधित आहे. जर ही जागा जड असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये जल तत्वाचे संतुलन बिघडते आणि अनेक प्रकारच्या समस्या येतात. या ठिकाणी स्वयंपाकघर बांधल्यास त्या घरात राहणाऱ्या लोकांना पोटासंबंधीचे आजार आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागतो.

4 वास्तूनुसार एखाद्या वास्तूची ईशान्य दिशेपासून वेगळा राहीला तर घरातील लोकांना रक्ताच्या विकारांनी ग्रासावे लागते. या वास्तुदोषामुळे तिथे राहणाऱ्या महिलांना लैंगिक आजारही होऊ शकतात. या दोषाचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

5 वास्तूनुसार, इमारतीचा उत्तर-पश्चिम भाग म्हणजेच पश्चिम कोन हा हवेच्या घटकाशी संबंधित असतो. अशा स्थितीत हे स्थान नेहमी खुले ठेवणे शुभ असते. या ठिकाणी जड सामान ठेवू नये किंवा जड बांधकाम करू नये, अन्यथा वाताचे विकार आणि मानसिक आजार होण्याचा धोका असतो.

इतर बातम्या : 

Akshay Navami 2021| आवळा नवमी म्हणजे काय? आवळा नवमी कधी असते, जाणून घ्या व्रताची विधी आणि कथा

Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील