AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील

आचार्य चाणक्यांनी त्यांचे विचार चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात आचार्य यांनी व्यावहारिक जीवन आणि गृहजीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील
chanakya niti
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : आचार्य चाणक्यांनी त्यांचे विचार चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात आचार्य यांनी व्यावहारिक जीवन आणि गृहजीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यनीती स्त्री आणि शत्रू बद्दल सांगितले आहे. अनेकवेळा आचार्य चाणक्यांचे शब्द ऐकताना खूप कठोर वाटतात, परंतु वर्तमानातील वास्तवाच्या कसोटीवर ते पूर्णपणे उतरतात. त्यांचे विचार आयुष्याला एक वळण लावून देतात.

आचार्य चाणक्यांची धोरणे लक्षात ठेवली तर माणूस जीवनातील प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकतो. चाणक्य हे राजकारण आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. आचार्यांचे शब्द समजून घेतले तर जीवनातील सर्व अडचणी सहज दूर होऊ शकतात. चाणक्य नीतीमध्ये मानवी समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख आहे.

चाणक्य नीतीनुसार, जो कोणी आपल्या प्रेयसीला किंवा पत्नीला सुरक्षिततेची भावना देतो, त्यांच्यातील प्रेम कधीच कमी होत नाही. कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीमध्ये वडिलांचे रूप दिसते.

तुमचा शत्रू नेहमी तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करेल, यामुळे तुम्हाला राग येईल. कारण रागात माणसाची शक्ती आणि समजून घेण्याची शक्ती अर्धवट राहते. पण तुमच्या रागाचा फायदा तुमच्या शत्रूला होतो. शत्रूने चिथावणी दिल्यावर नेहमी शांत राहा आणि योग्य वेळी तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा.

एवढेच नाही तर चाणक्याच्या धोरणानुसार जिथे मान-सन्मान नाही, नोकरीची व्यवस्था नाही, शिक्षण नाही, तिथे घर बांधू नये. अशा ठिकाणांपासून अंतर ठेवावे.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने कधीही आपल्या कोणत्याही शत्रूचा द्वेष करू नये. जर तुम्ही तुमच्या शत्रूचा द्वेष करत असाल तर तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता गमावून बसता. ज्यामुळे तुम्ही फक्त त्याची कमजोरी पाहू शकता आणि तुम्ही त्याची ताकद पाहू शकत नाही. अशा वेळी माणसाने नेहमी आपल्या शत्रूला मित्र म्हणून पाहावे आणि त्याच्या गुणवत्तेचाही विचार करावा. इतकेच नाही तर बुद्धिमान व्यक्तीने कधीही त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल इतर कोणाशीही चर्चा करू नये.

इतर बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील

Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य

Female Thumb Prediction : हाताचा अंगठा सांगतो महिलांचा स्वभाव, जाणून घ्या याबाबत सर्व काही

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.