AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Vastu Tips: दुसऱ्यांकडून चुकूनही ‘या’ वस्तू आणू नका, अन्यथा वाईट शक्तींना मिळेल आमंत्रण….

Positive Vastu Tips: बऱ्याच वेळा, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असते, तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून अनेक गोष्टी मागतो. पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू लोकांकडून घेऊन येऊ नये.

Home Vastu Tips: दुसऱ्यांकडून चुकूनही 'या' वस्तू आणू नका, अन्यथा वाईट शक्तींना मिळेल आमंत्रण....
| Edited By: | Updated on: Feb 23, 2025 | 9:00 PM
Share

आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी असे सर्वांना वाटते. तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहे ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. अनेक लोकांना घरामध्ये सजावटीसाठी नविन वस्तू घेऊन येण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का काही वस्तू तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक करू शकतात. या वस्तूंमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आणि तण तणावाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये चला जाणून घेऊया घरात अशा दुसऱ्यांचा कोणत्या वस्तू घेऊन येऊ नये.

आपण अनेक वेळा बघतो की मंदिरामध्ये जास्त गर्दी असेल किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी लोकं बऱ्याचवेळा दुसऱ्यांची चप्पल आणि बूट घालतात. परंतु, वास्त्रुशास्त्राच्या नियमानुसार असे केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या योऊ शकतात असे केल्यामुळे तुमची महत्त्वाची कामे लांबणीवर जाऊ शकतात ज्यामुळे तुमची प्रगती थांबते. ज्या लोकांचे बूट किंवा चप्पल तुम्ही घालता त्या व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे दुसऱ्यांची चप्पल कधीच वापरू नका.

दुसऱ्या लोकांच्या घरातील फर्निचरही तुमच्या घरात आणू नये. वास्तूशास्त्राच्या मान्यतेनुसार, दुसऱ्यांच्या घराचील फर्निचर तुमच्या घरात आणल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा वाढू शकते, त्यासोबतच या गोष्टीमुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकते. दुसऱ्यांच्या घरातील फर्निचर आणल्यामुळे तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळा, गरज पडल्यास, आपण इतरांकडून छत्री मागतो. दुसऱ्यांकडून छत्री मागणे आपल्याला सामान्य वाटेल. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांची छत्री वापरणे अजिबात योग्य मानले जात नाही. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, इतरांच्या छत्र्या त्यांना लवकरात लवकर परत कराव्यात. वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की कधीही दुसऱ्याच्या घरातून गॅस स्टोव्ह किंवा स्टोव्ह मागू नये. असे केल्याने कुटुंबाचे आशीर्वाद थांबू शकतात. यासोबतच, तुम्ही कधीही दुसऱ्याकडून आलेल्या लोखंडी वस्तू तुमच्या घरी आणू नयेत. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून लोखंडी वस्तू आणता तेव्हा शनिदेवही त्यासोबत घरात येतात. त्यामुळे घरात अनेक समस्या वाढू लागतात.

 ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो….

घरातील सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी तुम्ही सध्याकाळी तुमच्या घरातील मंदिरासमोर दिवा लावा.

तुमच्या घराच्या मुख्यद्वारा जवळ तूपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते.

घरामधील खोल्या स्वच्छ आणि सुटसुटीत असले पाहिजेल ज्यामुळे तुमच्या घरातील उर्जा हसत खेळत राहाते.

घरातून बाहेर जाताना देवाचे तुमच्या पूर्वजांचे आणि आई वडिलांचे आशिर्वाद घेतल्यामुळे तुमची कामामध्ये प्रगती होते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.