विवाहित स्त्रियांनी चुकूनही घालू नये ‘हे’ दागिने

प्रत्येक स्त्री तिच्या पतीला (Husband) दीर्घायुष्य (Long life) मिळावे यासाठी अनेक उपास, व्रत-वैकल्य करत असते. पतीला सर्व कामात यश मिळावे (Success) तसेच त्याची प्रगती व्हावी यासाठी ती नेहमी प्रार्थना करत असते. मात्र अश्यातच पत्नीच्या काही गोष्टींचा परिणाम पतीवरही होतो. दागिन्यांनी सजलेली स्त्री समृद्धी दर्शवत असते, असा शास्त्रानुसार एक नियम आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने दागिने (Jewellery)  […]

विवाहित स्त्रियांनी चुकूनही घालू नये हे दागिने
Nitish Gadge | Updated on: Jun 23, 2022 | 10:30 PM

प्रत्येक स्त्री तिच्या पतीला (Husband) दीर्घायुष्य (Long life) मिळावे यासाठी अनेक उपास, व्रत-वैकल्य करत असते. पतीला सर्व कामात यश मिळावे (Success) तसेच त्याची प्रगती व्हावी यासाठी ती नेहमी प्रार्थना करत असते. मात्र अश्यातच पत्नीच्या काही गोष्टींचा परिणाम पतीवरही होतो. दागिन्यांनी सजलेली स्त्री समृद्धी दर्शवत असते, असा शास्त्रानुसार एक नियम आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने दागिने (Jewellery)  परिधान केल्याने पतीच्या आरोग्यासंबंधी आणि प्रगतीशी संबंधित अशी मान्यता आहे. आजकालच्या स्त्रिया फॅशननुसार दागिने परिधान करतात. मात्र तसे करणे शास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे. चला तर जाऊन घेऊ या हे दागिने नेमके कोणते आहेत ते.

हिंदू शास्त्रानुसार विवाहित स्त्रीला प्रत्येक सण-समारंभात अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या या युगात या गोष्टींवर फार कमी लोकांचा विश्वास आहे. जिथे मुली प्रत्येक गोष्टीत खूप पुढे गेल्या आहेत, त्याच विवाहित महिला आजकाल फॅशननुसार गोष्टी वापरण्यावर विश्वास ठेवतात. आजच्या काळात विवाहित महिलाही अशा अनेक वस्तू घालतात, ज्यामुळे त्यांच्यात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. विवाहित महिलांनी फॅशन जरूर करावी, पण फॅशनसोबतच त्यांनी आपली संस्कृती आणि वास्तुशास्त्राचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  1. पांढऱ्या रंगाची साडी : सुहासिनींनी कधीही पांढऱ्या रंगाची साडी घालू नये. मात्र, आजच्या काळात महिला पांढऱ्या रंगाची साडी नेसण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पांढरी साडी नेसल्याने विवाहित महिलांचा पुण्यधर्म संपतो, वैवाहिक नात्यात नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो.
  2. पायात सोन्याचे घटक: अनेक विवाहित स्त्रिया पायात सोन्यापासून बनवलेल्या पैंजन किंवा जोडवे घालतात. विवाहित महिलांसाठी हे अशुभ मानले जाते. पायात सोन्याचे दागिने घातल्याने कुबेर देव नाराज होतात, ज्यामुळे जीवनात दारिद्र्य येऊ शकते. त्यामुळे घराच्या उत्पन्नात अडथळे येतात, पतीची प्रगतीही थांबते आणि आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे विवाहित महिलांनी नेहमी पायात चांदीचे मूलद्रव्य घालावे.
  3.  काळ्या रंगाच्या बांगड्या : सुहासिनींनी काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत. कारण त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवनही बिघडू शकते. त्यांच्या घरातही नकारात्मक शक्ती वावरू लागतात. याशिवाय घरातील मुलांवरही अनेक समस्या येऊ शकतात.
  4. मंगळसूत्र न घालणे : हिंदू शास्त्रानुसार वैवाहिक महिलांनी कधीच मंगळसूत्र आपल्या गळ्यापासून दूर करू नये, म्हणजेच काढू नये. ही गोष्ट सर्वात वाईट मानली जाते. कारण हिंदू धर्मशास्त्रात फक्त विधवा महिला मंगळसूत्र गळ्यात घालत नाही. त्यामुळे मंगळसूत्र न घालणे हे पतीच्या आयुष्यात वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us