AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करता? चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका अन्यथा…

सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक जण घरात दिवा लावतो, हिंदू धर्मात त्याचं महत्त्व देखील फार मोठं आहे... पण दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर जाणून घ्या उरलेल्या वातीचं काय करायचं.

दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करता? चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका अन्यथा...
| Updated on: Jul 12, 2026 | 2:41 PM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला एक वेगळ महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक धार्मिक महत्त्व लपलेलं आहे. अशात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव पूजा करताना लावण्यात येणारा दिवा… घरातील देवघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणं आवश्यक मानलं जातं. असं देखील म्हटलं जातं की, दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते आणि दिवा हा प्रकाशाचं, देवाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानला जातो. पण, दिवा विझल्यानंतर किंवा पूर्णपणे जळून गेल्यानंतर उरलेल्या वातीबद्दल लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. बरेच लोक वातींना सामान्य कचरा समजून कचराकुंडीत टाकतात. जर तुम्हीही असं करत असाल, तर असं करु नका. शास्त्रांमध्ये पूजेशी संबंधित लहान वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी विशेष नियम दिले आहेत. उरलेल्या वाती थेट कचऱ्यात टाकणं हे केवळ धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जात नाही, तर त्यामुळे घरात नकारात्मकताही येऊ शकते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार उरलेल्या वातींचे काय करावं, हे जाणून घेऊया.

शास्त्रानुसार, जेव्हा आपण तूप किंवा तेलात वात भिजवून मंत्रोच्चार आणि शुद्ध भावनेने ती पेटवतो, तेव्हा तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. ती वात देवाला समर्पित केलेली असते. अशी पवित्र वस्तू तुडवली जाईल अशा ठिकाणी किंवा घाणीत टाकल्याने देव आणि पूर्वजांचा दोष निर्माण होऊ शकतो. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकतं आणि मानसिक ताण वाढू शकतो. जर तुमच्या घरात रोज दिवा लावल्यानंतर वात शिल्लक राहत असेल, तर ती फेकून देण्याऐवजी काही विशेष पद्धतींचा अवलंब करा.

तुळशीच्या किंवा कुंडीतील मातीत टाका : उरलेली वात गोळा करा आणि घरातील तुळशीसारख्या पवित्र रोपाच्या मातीत टाका. कालांतराने, ती मातीत मिसळून जाईल. फक्त काळजी घ्या की त्या जागेवर कोणाचाही पाय पडणार नाही.

पवित्र नदीत विसर्जन: जर तुमच्या घराशेजारी एखादी पवित्र नदी, तलाव किंवा जलाशय असेल, तर आठवड्याचे किंवा महिन्याचे जमा झालेले पाणी तिथे विसर्जित करा.

अग्निदेवाला अर्पण: जर तुम्ही घरी नियमितपणे हवन किंवा कापूर आरती करत असाल, तर या उरलेल्या वाती त्या हवनाच्या अग्नीत टाका. या वाती आधीच पूजेचा भाग असल्याने, त्यांना अग्नीत जाळणे सर्वात पवित्र मानलं जातं.

रोजच्या पूजेत उरलेल्या वातींव्यतिरिक्त, अखंड दिव्याच्या वातीसाठीही काही नियम आहेत. जर तुम्ही नवरात्री, दिवाळी किंवा कोणत्याही विशेष समारंभात अखंड दिवा लावला असेल, तर त्याची उरलेली वात अत्यंत सुरक्षित ठेवली पाहिजे. ही वात घरात कुठेही पडून ठेवू नका. समारंभ संपल्यानंतर, ही वात वाहत्या पवित्र नदीत विसर्जित करणे सर्वोत्तम मानलं जात .

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार