IND vs IRE: अर्धशतक करणारा अभिषेक शर्माच ठरला टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन; कोणती एक मोठी चूक केली?

भारत आणि आयर्लंड यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने अतिशय वाईट कामगिरी केली. भारतीय संघाकडून झालेल्या तीन मोठा चुकांच्या परिणाम सामना गमवावा लागला.

IND vs IRE: अर्धशतक करणारा अभिषेक शर्माच ठरला टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन; कोणती एक मोठी चूक केली?
abhishek sharma
| Updated on: Jun 27, 2026 | 8:58 AM

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. या सामन्याचा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यास सामन्याचे नाणेफेक तर भारतीय संघाने जिंकले पण सामना मात्र गमावला. प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने 182 धावा केल्या. भापरतीय संघाला मात्र 148 धावा करता आल्या आणि भारतीय संघाने सामना 34 धावांनी गमावला. आयर्लंडने टीम इंडियाला पूर्ण 20 षटके खेळू दिली नाहीत किंवा 150 धावा देखील करू दिल्या नाहीत. टीम इंडिया 18.5 षटकांत केवळ 148 धावांवर सर्वबाद झाली. भारतीय संघाने तीन चुकामुंळे सामना गमावला.

आयर्लंडच्या विजयात गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये केवळ 30 धावांत तीन गडी गमावले. असे असूनही, आयर्लंडने 182 धावा केल्या, जो बेलफास्टमधील या मैदानावरचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. हे घडले कारण टीम इंडियाने तीन झेल सोडले, त्यापैकी दोन झेल त्यांना महागात पडले.

भारतीय संघाने आपली पहिली चूक तिसऱ्या षटकात केली, जेव्हा शिवम दुबेने अर्शदीप सिंगचा झेल सोडला. चेंडू चौकारासाठी गेला. तो झेल टिम टेक्टरने घेतला, जो त्यावेळी केवळ चार धावांवर होता. पुढच्याच षटकात तो बाद झाला असला तरी, त्याने 13 धावा जोडून 17 धावांवर डाव संपवला. त्यानंतर सोडलेला झेल भारतासाठी सर्वात विनाशकारी ठरला. 11 व्या षटकात, अभिषेक शर्माने गॅरेथ डेलानीचा एक सोपा झेल सोडला, जो त्यावेळी फक्त 8 धावांवर होता. त्यानंतर डेलानीने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार आणि एका चौकारासह 32 चेंडूंमध्ये 49 धावांची वेगवान खेळी केली.

13 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरकडूनही अशीच चूक झाली, त्याने आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरचा झेल सोडला. हा झेल इतर दोन झेलांपेक्षा थोडा अधिक कठीण होता, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो अपेक्षितच होता. टकर फक्त 28 धावांवर होता. चेंडू सुंदरच्या हाताला लागून 4 धावा झाल्या. आयर्लंडच्या कर्णधाराने याचा फायदा उचलला आणि 50 धावा केल्या. यादरम्यान, त्याने आणि डेलानीने मिळून केवळ दोन षटकांत 46 धावा केल्या आणि सामन्याचे चित्रच पालटले. याचा अर्थ, एकूण 3 झेलांची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली आणि त्यांनी केवळ 76 धावा दिल्या, जे त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.

Follow Us