AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: ‘कॅप्टन म्हणून ही उत्तम सुरूवात आहे’; आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून मॅच गमावल्यानंतरही श्रेयस अय्यर असं का म्हणाला?

भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना रंगला ज्यात भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतर आता पहिलाच टी-20 सामना गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचा खापर कोणावर फोडले ते पाहा...

IND vs IRE: 'कॅप्टन म्हणून ही उत्तम सुरूवात आहे'; आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून मॅच गमावल्यानंतरही श्रेयस अय्यर असं का म्हणाला?
shreyas iyer
| Updated on: Jun 27, 2026 | 8:29 AM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे खेळला गेला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची टी-20 मालिकेत नामुष्कीची सुरुवात झाली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने 182 धावा केल्या आणि नऊ विकेट गमावल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकता न आल्याने सर्वात मोठा अपसेट पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, आयर्लंडने भारताला पराभूत करून आपल्या क्रिकेट इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडला. आयर्लंडकडून झालेल्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने आपली नाराजी व्यक्त केली आणि पराभवासाठी कोणाला जबाबदार धरले ते पाहा…

भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत आयर्लंडला 51 धावांवर चार गडी बाद अशा बिकट परिस्थितीत आणून ठेवले. त्यानंतर आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरने 50 आणि गॅरेथ डेलानीने 49 धावा केल्या, ज्यामुळे आयर्लंडने 182 धावांपर्यंत मजल मारली.

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अवघ्या आठ षटकांत चार बळी घेतले, पण मधल्या षटकांमध्ये त्यांना एकही विकेट मिळवता आला नाही, ज्यामुळे आयर्लंडला भारतासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. गोलंदाजीबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला, “गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक गोलंदाजी केली, पण नंतर खूप धावा दिल्या. सुरुवातीला मी 140 धावांचा विचार करत होतो, पण तसे झाले नाही. कर्णधार म्हणून ही एक चांगली सुरुवात होती.”

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीला संयम राखला, पण नंतर ते गडबडले. त्यानंतर, भारतीय फलंदाजही फार काही करू शकले नाहीत. एकट्या अभिषेक शर्माने 20 चेंडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावले. मात्र, संजू सॅमसन (5), इशान किशन (1) आणि श्रेयस अय्यर (3) फार काही करू शकले नाहीत. शिवम दुबेने 25 धावा केल्या. विजय मिळवण्यासाठी ते पुरेसे नव्हते आणि भारतीय संघ 18.5 षटकांत 148 धावांवर सर्वबाद झाला. क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला पराभव ठरला, भारतीय संघाला 34 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यावर मोठा डाग लागला.

Follow Us
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा