AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2024 : उपांत्य फेरीसाठीचे चार संघ ठरले, भारत पाकिस्तानचा सामना या दिवशी

वुमन्स आशिया कप स्पर्धेचा गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ ठरले आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांचा समावेश आहे.

Asia Cup 2024 : उपांत्य फेरीसाठीचे चार संघ ठरले, भारत पाकिस्तानचा सामना या दिवशी
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 24, 2024 | 9:58 PM
Share

वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांनी धडक मारली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन संघांनी साखळी फेरीत एकही सामना गमवला नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ अ आणि ब गटात टॉपला राहिले. तर बांग्लादेश आणि पाकिस्तानने प्रत्येक एक सामना गमवल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांग्लादेश आणि श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 26 जुलैला दुपारी 2 वाजता होणार आहे. तर श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 26 जुलैला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. आता या चार संघांपैकी कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत आणि श्रीलंका हे दोन संघ अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आहे. मात्र क्रिकेट अनिश्चितेतचा खेळ आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही.

वुमन्स आशिया कप स्पर्धा 1984 पासून सुरु आहेत. यंदा या स्पर्धेचं 17वं पर्व आहे. भारताने 8 वेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. तर श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018, 2023 साली जेतेपद मिळवलं आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 साली चषकावर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली जेतेपद मिळवलं आहे. तर बांग्लादेशला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.

बांग्लादेशने तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पण तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली. 2012 साली पाकिस्तानने पराभवाची धूळ चारली. त्यानंतर 2016 आणि 2018 मध्ये भारताने बांग्लादेशला अंतिम फेरीत पराभूत केलं आहे. आता भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळतं? याकडे लक्ष लागून आहे. भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता बांग्लादेशला कठीण जाणार हे नक्की आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड