AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेली चूक पराभवासाठी कारण ठरली! सोशल मीडियावर चर्चा

दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला. या पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. यात हार्दिक पांड्याची खेळीही कारणीभूत धरली जात आहे. नेमकं असं काय घडलं की पराभवाचं गणित मांडताना हार्दिक पांड्याला दोषी धरलं जात आहे.

हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेली चूक पराभवासाठी कारण ठरली! सोशल मीडियावर चर्चा
| Updated on: Nov 11, 2024 | 3:35 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेने 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिका विजयासाठी पुढच्या दोन सामन्यात कोण वरचढ ठरतं? याची उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या पराभवाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे या पराभवाचं सोशल मीडियावरही विश्लेषण होत आहे. यात हार्दिक पांड्यालाही दोषी धरलं जात आहे. शेवटच्या षटकात केलेली चूक भोवल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. झालं असं की, दुसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव नशिब फुटकं निघालं आणि नाणेफेक गमावली. त्यामुळे प्रथम फलंदाजी वाटेला आली. यावेळी संजू सॅमसनकडून अपेक्षा होत्या. मात्र तो फेल गेला. त्यात इतर फलंदाजही काही खास करू शकले नाही. त्यामुळे टीम इंडिया कशीबशी 124 धावांवर पोहोचली. असं असलं तरी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकांमध्ये काही धावा कमी पडल्या. यासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरलं जात आहे.

भारताच्या डावात शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या स्ट्राईकला होता. भारताने 19 षटकात 6 बाद 118 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्या स्ट्राईक असल्याने अपेक्षा होत्या. पहिलाच चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर फटका मारला पण कॅच सुटला. पण धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडू पुन्हा निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एक जोरदार फटका मारला. पण हातातला झेल सुटला तरी धाव घेतली नाही. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. खरं तर या षटकात 20 धावा अपेक्षित होत्या. मात्र फक्त 6 धावा आल्या.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेला 12 चेंडूत 13 धावांची गरज होती. अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता आणि समोर एकाकी झुंज देणारा ट्रिस्टन स्टब्स होता. स्टब्सने पहिल्या दोन चेंडूवर दोनचौकार मारले आणि दबाव कमी केला. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे टीम इंडियाचा विजयाचा रथ रोखला गेला. आतापर्यंत भारताने सलग 11 सामने जिंकले होते. मात्र आता विजयात खंड पडला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.