
India vs South Africa: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा पास झाल्यानंतर टीम इंडिया सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. पण अभिषेक शर्माच्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करणारा अभिषेक शर्माची बॅट सराव सामन्यात शांत होती. अभिषेक शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 18 चेंडूत फक्त 24 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 133.33 चा होता. त्याच्या तुलनेत ही फलंदाजी म्हणजे खूपच संथ होती. त्याने या डावात त्याने 3 चौकार आणि एक षटकार मारला. त्याने या खेळीदरम्यान बरेच निर्धाव चेंडू घालवले. खरं तर या समन्यात तसं काही प्रेशर नव्हतं. तरीही धीमी फलंदाजी केल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहे.
अभिषेक शर्मा फलंदाजीला आला तेव्हा चेंडू काही बॅटवर आला नाही. त्याला फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागला. पहिल्या 7 चेंडूत त्याला फक्त एक धाव काढता आली. पावरप्लेमध्ये सुरुवातीचे 6 चेंडू निर्धाव गेले. पण चौथ्या षटकात त्याचा सामना कॉर्बिन बॉशशी झाला आणि त्याच्या षटकात सलग तीन चौकार मारले. पाचव्या षटकात नॉर्खियाच्या गोलंदाजीवर षटकार मारला. पावर प्ले संपल्यानंतर अभिषेक शर्माला पुन्हा अडणीत आल्यासारखा वाटला. 15 चेंडू खेळल्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव गेले. त्यामुळे डगआऊटमधून अभिषेक शर्माला रिटायर्ड आऊटचा कॉल आला. 8 षटक संपल्यानंतर अभिषेक शर्मा तंबूत परतला.
अभिषेक शर्मा प्रत्येक सामन्यात वेगाने धावा करतो. यात आता नवं काही राहिलं नाही. पण त्याची संथ फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींचा चिंता वाटू लागली आहे. कारण त्याने पाटा विकेटवर संथ फलंदाजी केली. दुसरीकडे, इशान किशनने 265 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. तर तिलक वर्माने 236 च्या स्ट्राईक रेटने 45 धावांची खेळी. त्यामुळे अभिषेक शर्मा संथ का खेळला हा विषय चर्चेत आहे. रिटायर्ड आऊट झाल्यानंतर अभिषेक शर्मा थोडा नाराज दिसला. कदाचित झाल्या वेगाने धावा करायच्या होत्या.