Rishabh Pant: ऋषभने भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सांगताच, रातोरात बदल

| Updated on: Jan 02, 2023 | 11:55 AM

Rishabh Pant: ऋषभ पंतने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना अशी कुठली गोष्ट सांगितली, ज्यामुळे एक यंत्रणा ताबडतोड Action मोडमध्ये आली

Rishabh Pant: ऋषभने भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सांगताच, रातोरात बदल
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातातून ऋषभ सुदैवाने बचावला. पण तो गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर ऋषभच्या कारचा अपघात कसा झाला? या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. पोलिसांनी कार चालवताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे अपघात झाला, असं म्हटलय. याच प्रश्नाच उत्तर शोधताना रस्त्यावरील खड्डे सुद्धा ऋषभच्या अपघाताला कारण ठरल्याच बोललं जातय.

NHAI तात्काळ Action मोडमध्ये

रस्त्यावरील खड्डे अपघाताच एक कारण असल्याच समोर आल्यानंतर NHAI तात्काळ Action मोडमध्ये आली. त्यांनी तात्काळ अपघातस्थळी असलेले खड्डे भरले. सध्या ऋषभवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पुष्कर सिंह धामी काय म्हणाले?

ऋषभ पंतने दिलेल्या जबानीच्या आधारावर उत्तराखंड पोलिसांनी डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याच म्हटलं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी, ऋषभ पंतला भेटल्यानंतर रुग्णालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. “पंतने सांगितलं की, तिथे काही खड्डे होते, जे अंधारात अचानक समोर आले. ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार डिवायडरला धडकली” असं धामी म्हणाले. पंतची तब्येत आता चांगली आहे. पंतला मिळणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंटवर त्याचं कुटुंब समाधानी असल्याचं धामींनी सांगितलं.

स्थानिकांच म्हणणं काय?

पंतला भेटून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या खड्डयांचा उल्लेख केला, स्थानिक लोकांच तेच म्हणणं आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्या जागेवर मृत्यू होत असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. आतापर्यंत अनेक दुर्घटना तिथे झाल्या असून अनेकांनी आपले प्राण गमावलेत.

रातोरात झाली दुरुस्ती

अजूनपर्यंत तरी कोणीही त्या खड्ड्यांबद्दल काहीही करायला तयार नव्हतं. पण पंतच्या अपघाताची चर्चा सुरु होताच, NHAI ने रातोरात ते खड्डे भरले. जणू त्या रस्त्यावर खड्डे नव्हतेच. पंतच्या कार अपघातात तिथली एक रेलिंग तुटली होती. ती सुद्धा दुरुस्त करण्यात आली.