Corona Virus चा रणजी करंडक स्पर्धेला फटका, BCCI ने नाईलाजाने घेतला ‘हा’ निर्णय

| Updated on: Jan 04, 2022 | 11:05 PM

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचा फटका देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना बसला आहे. क्रिकेटवर कोरोनाचे सावट आहे.

Corona Virus चा रणजी करंडक स्पर्धेला फटका, BCCI ने नाईलाजाने घेतला हा निर्णय
Follow us on

मुंबई: भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचा फटका देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना बसला आहे. क्रिकेटवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या ताज्या लाटेमुळे BCCI ने रणजीसह काही महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. बीसीसीआयने 2021-22 मोसमासाठीच्या रणजी करंडक, कर्नल सी.के.नायडू आणि सिनियर महिलांची टी-20 लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (After Rising Corona cases BCCI postpones Ranji Trophy for 2021-22 season)

सध्या सुरु असलेली कूच बिहार करंडक स्पर्धा वेळापत्रकानुसार चालू राहणार आहे. रणजी करंडक, कर्नल सी.के.नायडू करंडक स्पर्धेला जानेवारी महिन्यात प्रारंभ होणार होता. महिला टी-20 लीग स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार होती.

बोर्ड खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पदाधिकारी आणि अन्य कोणाचाही जीव धोक्यात घालणार नाही, असे बीसीसीआयने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. म्हणूनच सध्या होणाऱ्या स्पर्धा टाळण्यात आल्या आहेत. BCCI परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेईल. स्पर्धेची तयारी सुरु असतााना रणजी संघ आणि अन्य क्रिकेट स्पर्धांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. मुंबई, बंगाल आणि अन्य राज्यांच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.

संबंधित बातम्या:
Shardul Thakur: शार्दुल लोकप्रिय, यशस्वी का? ट्रेन करणाऱ्या कोचने सांगितलं त्यामागचं कारण…
IND vs SA: शार्दुल ठाकूरच्या सात विकेटमुळे जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर
Shardul Thakur: तू आहेस तरी कोण? स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे अश्विनने विचारलेला प्रश्न जगाला कळला