AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामन्याआधी टीम इंडियाला ‘युजलेस’ म्हणणाऱ्या मायकल वॉनची नवी प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर राग अनावर, म्हणाला…

चौैथ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवल्यावर टीम इंडियाचे टीकाकार मायकल वॉन पुन्हा जागा झाला आहे. त्याने आता नवी प्रतिक्रिया देत सामन्यानंतर आपलं मत प्रदर्शन केलं आहे.

सामन्याआधी टीम इंडियाला 'युजलेस' म्हणणाऱ्या मायकल वॉनची नवी प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर राग अनावर, म्हणाला...
मायकल वॉन
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:01 PM
Share

लंडन :भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघ (India) 78 धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर सामन्यातही भारताला एक डाव आणि 76 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा नेहमीचा टीकाकार मायकल वॉन (Michael Vaughan) याने भारतीय संघावर ट्विट करत हल्ला केला.एका ट्विटमध्ये त्याने भारतीय संघाला थेट युजलेस (बिना कामाचे) असं म्हटलं होतं. पण चौथ्या कसोटीत भारताने 157 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत वॉनसह सर्वच टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

मायकल वॉनने भारताच्या विजयानंतर वैतागत आपला सर्व राग इंग्लंड संघावर काढला आहे. वॉन द टेलिग्राफला दिलेल्या माहितीत म्हटला की,’इंग्लंड कसोटी संघाची गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातील खराब प्रदर्शन सर्वांसमोर आलं आहे. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलं. अनेक सोप्या संधी सोडल्यामुळे भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या करु शकले. पहिल्या डावात महत्त्वाचे फलंदाज गेल्यानंतर इंग्लंडने भारताला 125 धावांवर सर्वबाद करायला हवं होतं. पण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील खराब प्रदर्शनामुळे असं करता आलं नाही.’ दरम्यान भारताच्या या विजयामुळे मायकल वॉनच्या आधीच्या सर्व प्रतिक्रियांना भारतानं खेळातून चोख प्रत्यूत्तर दिल्याने त्याचा राग अनावर झाला आहे.

आधी काय म्हणाला होता वॉन?

तिसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवानंतर मायकल वॉन भारतीय संघाला थेट युजलेस म्हटला होता. त्याने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “इंग्लंडकडून चमकदार आणि क्रूर कामगिरी, मिळेल तितकं कमीच. लॉर्ड्सनंतर असे प्रदर्शन करणे संघाचे कॅरेक्टर दर्शवते, जे त्यांच्या कर्णधाराकडून येतं… मागील काही दिवस भारताने विसरण्यासारखे आहेत. ते (टीम इंडिया) खरोखर युजलेस दिसत होते. ”

इतर बातम्या

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर ‘ओव्हल’ सर

IND vs ENG : फॉर्मात परतलेल्या पुजाराच्या शॉटने अंपायरचं डोकं फुटलं असतं, पाहा थरारक Video

(After saying Team india Useless Michael Vaughan now angry over england team After defeat in second test at oval)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.