मुंबई : विराट सेनेनं अर्थात भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) इंग्लंडमध्ये इतिहास रचलाय. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी पराभव केलाय. विजयासाठी आवश्यक असलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सामन्याच्या अखेरच्या दिवशी 209 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुरराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोंलदाजी केली आणि भारताला दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. इंग्लंडने सकाळच्या सत्रात 27 षटकात दोन विकेटच्या बदल्यात 54 धावा बनवल्या. तर दुसऱ्या सत्रात 25.1 षटकात 62 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या. (Indian cricket team wins after 50 years at the Oval)