AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

टीम इंडियाकडून क्रिकेट खेळलेला आणि आयपीएलमध्ये आपल्या खेळीने सगळ्यांचं मन जिंकणाऱ्या एका खेळाडूने राजकारणात प्रवेश केला आहे. तो आता राजकीय आखाड्यात आपलं नशीब आजमावणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याने पक्षात प्रवेश केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

टीम इंडियाच्या या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
rayadu
| Updated on: Dec 28, 2023 | 8:28 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू याने आज वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अंबाती रायडू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आज पक्षात जाहीर प्रवेश केला. अंबाती रायडूचा पक्षात समावेश केल्याने वायएसआर काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तरुणांना पक्षात आणण्याचा निर्णय वायएसआर काँग्रेसने घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य अंबाती रायुडू याला मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी औपचारिकपणे वायएसआर काँग्रेसमध्ये समाविष्ट केले. यावेळी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते. अंबाती रायडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.

रायडूची कारकीर्द

अंबाती रायडून याने २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने एकूण 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 47 च्या सरासरीने त्याने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकेही आहेत. रायुडूने भारतासाठी 6 टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. 2018 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. या काळात रायुडूने 203 सामन्यात 4328 धावा केल्या. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन आणि चेन्नई सुपर किंग्जसह तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.