AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, ‘हा तर निव्वळ नालायकपणा’!

आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, 'हा तर निव्वळ नालायकपणा'!
| Updated on: Sep 09, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023  सुरू झाला टीम इंडियाचे दोनसामने झाले, यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. नेपाळविरूद्धचा सामना सोडला तर रोमांचक असं काही झालं नाही. त्यात पाऊस खोडा घालत असल्याने मॅचची लिंक तुटली की सर्व चाहत्यांचा मूड खराब होत आहे. आता परत एकदा भारत-पाक सामना होणार असून त्यावरही पावसाचं संकट आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?

‘जर राखीव दिवस ठेवण्यात आला असेल तर तो पूर्णपणे निर्लज्ज आहे. कारण एकाच स्पर्धेतील संघांबाबत वेगवेगळे नियम का केले जात आहेत. अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करणे पूर्णपणे अनैतिक असल्याचं व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. व्यंकटेश प्रसाद यांनी केलेल्या वक्तल्यावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याचाचा धागा पकडत चंडिका हथरुसिंघ यांनी टीका केली.

बांगलादेश संघाचे मुख्य कोच चंडिका हथरुसिंघ यांनीही भारत-पाक सामन्यासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव दिवसावरून निशाणा साधला. भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणं योग्य नाही. स्पर्धेमध्ये मध्येच अशा प्रकारे नियम बदलले जातात. जर असा नियम बदलला जावू शकतो तर आमच्यासाठीही तो असावा, असं चंडिका हथरुसिंघ म्हणाले.

आशियाई क्रिकेट परिषदेचा नियम

पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबर रोजी आरके स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका येथे होणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे त्या दिवशी संपूर्ण खेळ झाला नाही तर पहिल्या दिवशी जिथे संपला होता तिथून 11 सप्टेंबरला सामना पुन्हा सुरू होणार आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.