AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, ‘हा तर निव्वळ नालायकपणा’!

आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, 'हा तर निव्वळ नालायकपणा'!
| Updated on: Sep 09, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023  सुरू झाला टीम इंडियाचे दोनसामने झाले, यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. नेपाळविरूद्धचा सामना सोडला तर रोमांचक असं काही झालं नाही. त्यात पाऊस खोडा घालत असल्याने मॅचची लिंक तुटली की सर्व चाहत्यांचा मूड खराब होत आहे. आता परत एकदा भारत-पाक सामना होणार असून त्यावरही पावसाचं संकट आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?

‘जर राखीव दिवस ठेवण्यात आला असेल तर तो पूर्णपणे निर्लज्ज आहे. कारण एकाच स्पर्धेतील संघांबाबत वेगवेगळे नियम का केले जात आहेत. अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करणे पूर्णपणे अनैतिक असल्याचं व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. व्यंकटेश प्रसाद यांनी केलेल्या वक्तल्यावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याचाचा धागा पकडत चंडिका हथरुसिंघ यांनी टीका केली.

बांगलादेश संघाचे मुख्य कोच चंडिका हथरुसिंघ यांनीही भारत-पाक सामन्यासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव दिवसावरून निशाणा साधला. भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणं योग्य नाही. स्पर्धेमध्ये मध्येच अशा प्रकारे नियम बदलले जातात. जर असा नियम बदलला जावू शकतो तर आमच्यासाठीही तो असावा, असं चंडिका हथरुसिंघ म्हणाले.

आशियाई क्रिकेट परिषदेचा नियम

पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबर रोजी आरके स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका येथे होणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे त्या दिवशी संपूर्ण खेळ झाला नाही तर पहिल्या दिवशी जिथे संपला होता तिथून 11 सप्टेंबरला सामना पुन्हा सुरू होणार आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.