AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final | बुमराह ऑन फायर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त स्टार्ट

IND vs AUS World Cup Final | टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फार मोठ लक्ष्य देता आलेलं नाहीय. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भन्नाट सुरुवात केली आहे.

IND vs AUS Final | बुमराह ऑन फायर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त स्टार्ट
Jasprit Bumraj world Cup 2023 FinalImage Credit source: BCCI
| Updated on: Nov 19, 2023 | 7:10 PM
Share

IND vs AUS World Cup Final | ऑस्ट्रेलियासमोर तुलनेने कमी धावांचे लक्ष्य असताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे धोकादायक ठरु शकणारे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियासाठी ही एक चांगली बाब आहे. पावरप्लेमध्ये टीम इंडियाच टिच्चून गोलंदाजी करते तसेच विकेटही काढते. यात विकेट काढण्याचा सिलसिला कायम आहे. पण धावा थोड्या जास्त आहेत. बातमी लिहित असताना ऑस्ट्रेलियाच्या 5 ओव्हरमध्ये 41 धावा झाल्या आहेत. त्यांचे 2 फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियाला 240 धावांचा बचाव करायचा आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना आज सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. सुरुवातदेखील तशीच केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर (7) आणि मिचेल मार्श (15) तंबूत परतले आहेत. वॉर्नरला मोहम्मद शमीने विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. त्याने 3 चेंडूत 7 धावा करताना एक चौकार मारला. तेच दुसरा फलंदाज मिचेल मार्शला 15 चेंडूत 15 रन्सवर आऊट झाला. मार्शला बुमराहाने एका अप्रतिम चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्याने एक फोर, एक सिक्स मारला. 6 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 42 धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन दबाव वाढवून ठेवला. वॉर्नर आणि मार्श लवकर तंबूत परतण टीम इंडियाच्या दृष्टीने फायद्याच आहे. कारण कमी चेंडूत मॅचचा नूर पालटण्याची त्यांची क्षमता आहे.

जसप्रीत बुमराहचा अप्रतिम चेंडू

ऑस्ट्रेलियाचा तिसरा विकेट गेला आहे. जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर स्टीव्ह स्मिथला LBW आऊट केलं. त्याने 9 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार मारला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल तिघांनीच धावा केल्या. अन्य फलंदाजांनी निराश केलं. अन्यथा टीम इंडियाची धावसंख्या 240 च्या पुढे गेली असती. टीम इंडियाच्या 76 धावांवर 2 विकेट गेल्या होत्या. त्या तुलनेत 47 रन्सवर तीन विकेट गेल्या आहेत.

बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा.
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा.
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?.
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान.