AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final | बुमराह ऑन फायर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त स्टार्ट

IND vs AUS World Cup Final | टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फार मोठ लक्ष्य देता आलेलं नाहीय. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भन्नाट सुरुवात केली आहे.

IND vs AUS Final | बुमराह ऑन फायर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त स्टार्ट
Jasprit Bumraj world Cup 2023 FinalImage Credit source: BCCI
| Updated on: Nov 19, 2023 | 7:10 PM
Share

IND vs AUS World Cup Final | ऑस्ट्रेलियासमोर तुलनेने कमी धावांचे लक्ष्य असताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे धोकादायक ठरु शकणारे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियासाठी ही एक चांगली बाब आहे. पावरप्लेमध्ये टीम इंडियाच टिच्चून गोलंदाजी करते तसेच विकेटही काढते. यात विकेट काढण्याचा सिलसिला कायम आहे. पण धावा थोड्या जास्त आहेत. बातमी लिहित असताना ऑस्ट्रेलियाच्या 5 ओव्हरमध्ये 41 धावा झाल्या आहेत. त्यांचे 2 फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियाला 240 धावांचा बचाव करायचा आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना आज सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. सुरुवातदेखील तशीच केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर (7) आणि मिचेल मार्श (15) तंबूत परतले आहेत. वॉर्नरला मोहम्मद शमीने विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. त्याने 3 चेंडूत 7 धावा करताना एक चौकार मारला. तेच दुसरा फलंदाज मिचेल मार्शला 15 चेंडूत 15 रन्सवर आऊट झाला. मार्शला बुमराहाने एका अप्रतिम चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्याने एक फोर, एक सिक्स मारला. 6 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 42 धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन दबाव वाढवून ठेवला. वॉर्नर आणि मार्श लवकर तंबूत परतण टीम इंडियाच्या दृष्टीने फायद्याच आहे. कारण कमी चेंडूत मॅचचा नूर पालटण्याची त्यांची क्षमता आहे.

जसप्रीत बुमराहचा अप्रतिम चेंडू

ऑस्ट्रेलियाचा तिसरा विकेट गेला आहे. जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर स्टीव्ह स्मिथला LBW आऊट केलं. त्याने 9 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार मारला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल तिघांनीच धावा केल्या. अन्य फलंदाजांनी निराश केलं. अन्यथा टीम इंडियाची धावसंख्या 240 च्या पुढे गेली असती. टीम इंडियाच्या 76 धावांवर 2 विकेट गेल्या होत्या. त्या तुलनेत 47 रन्सवर तीन विकेट गेल्या आहेत.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा