AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाची टी 20 मालिकेसाठी घोषणा, 2 नव्या चेहऱ्यांना संधी

Indian Cricket Team : बीसीसीआयने 16 सदस्यीय भारतीय संघांची घोषणा केली आहे. टी 20 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 2 युवा खेळाडूंना निवड समितीने संधी दिली आहे.

Team India : टीम इंडियाची टी 20 मालिकेसाठी घोषणा, 2 नव्या चेहऱ्यांना संधी
bcci
| Updated on: Apr 15, 2024 | 10:31 PM
Share

भारतात सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. सर्व क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत आहेत. दररोज एकसेएक रंगतदार सामने होत आहेत. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेबाबत आणि टीममध्ये कोण कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध टी 20 मालिकेसाठी वूमन्स टीम इंडियाची घोषणा केलीय. बीसीसीआयने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वूमन्स क्रिकेट टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेला 28 एप्रिपलपासून सुरुवात होणार आहे.तर अंतिम सामना 9 मे रोजी पार पडणार आहे. हरमनप्रीत कौर बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

2 नव्या चेहऱ्यांना संधी

बीसीसीआय निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात 2 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. लेग-स्पिनर आशा शोभना आणि ऑलराउंडर सजीवन सजना यांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. आरसीबीच्या शोभनाने नुकत्याच पार पडलेल्या वूमन्स प्रीमियर लीग अर्थात डब्ल्यूपीएल 2024 मध्ये यूपी वॉरियर्सविरुद्ध 5 विकेट्स घेत तिने आपली छाप सोडली होती.

टीम इंडियाची घोषणा

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 28 एप्रिल, रविवार.

दुसरा सामना, 30 एप्रिल, मंगळवार.

तिसरा सामना, 2 मे, गुरुवार .

चौथा सामना, 6 मे, सोमवार.

पाचवा सामना, 9 मे, गुरुवार.

वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधानाा, शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, सायका इशाक, आशा शोभना , रेणुका सिंग ठाकुर आणि तीतस साधू.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.