AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: चार वर्षानंतर BCCI ने आयपीएलच्या Closing Ceremony बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय

IPL 2022: BCCI ने तब्बल चार वर्षानंतर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी (Closing Ceremony) आयोजित करण्यात आली नव्हती.

IPL 2022: चार वर्षानंतर BCCI ने आयपीएलच्या Closing Ceremony बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय
आयपीएल प्लेऑफ सामने Image Credit source: IPL
| Updated on: Apr 16, 2022 | 5:25 PM
Share

मुंबई: BCCI ने तब्बल चार वर्षानंतर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी (Closing Ceremony) आयोजित करण्यात आली नव्हती. यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने फॅन्ससाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) ची क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. बीसीसीआय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला काम सोपवणार असून त्यासाठी टेंडरही जारी केलं आहे. टेंडरसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल आयपीएलच्या साईटवर टाकण्यात आलीय. कुठलीही कंपनी एक लाख रुपये भरून टेंडर मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. भरलेली रक्कम परत मिळणार नाही, असंही या टेंडरमध्ये म्हटलं आहे.

अखेर चौथ्यावर्षी होणार क्लोजिंग सेरेमनी

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मुलाखतीत क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचे संकेत दिले होते. कोरोनामुळे मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलची ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. यापूर्वी वर्ष 2018 मध्ये क्लोजिंग सेरेमनी झाली होती.

कुठे होणार क्लोजिंग सेरेमनी?

IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. तिथेच क्लोजिंग सेरेमनीचा कार्यक्रम होईल. BCCI ने या प्लानच्या अमलबजावणीवर काम सुरु केलं आहे. आयपीएल 2018 पासून क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. 2019 मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे क्लोजिंग सेरेमनी टाळण्यात आली होती. 2020 मध्ये कोरोनाला सुरुवात झाली. तेव्हापासून ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झालेली नाही. आता कोरोनाचा वेग भरपूर मंदावलाय. त्यामुळे BCCI ने क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.