Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फटका बसणार?

Bcci Team India : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर रोहित आणि विराट या दोघांनाही फटका बसू शकतो.

Bcci चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फटका बसणार?
rohit shreyas harshit kl team indiaImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 3:57 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर बीसीसीआय आता लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय येत्या काही दिवसांमध्ये वार्षिक कराराची घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वार्षिक करारात अनेक उलटेफर पाहायला मिळू शकतात. काही खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे, तर काहींनी एका फॉर्मेटमधून निवृ्त्ती घेतली आहे. त्यामुळे या वार्षिक करारात मोठे बदल पाहायला मिळणार असल्याचं नक्की आहे. तसेच काही खेळाडू असेही आहेत जे करारबद्ध असूनही खेळत नाहीत. त्यामुळे बीसीसीआय त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देऊ शकते.

बीसीसीआय खेळाडूंना एकूण 4 श्रेणीमध्ये विभागते. बीसीसीआयकडून वार्षिक करारासाठी खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशाप्रकारे विभागलं जातं. कसोटी, वनडे आणि टी 20i अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्यांना ए ग्रेडमध्ये ठेवलं जातं. बीसीसीआयकडून गेल्या वार्षिक करारात एकूण 4 खेळाडूंचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांना ए प्लस कॅटेगरी मिळणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे विराट आणि रोहितला 2 कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. बीसीसीआय ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये देते. तसेच ए ग्रेड खेळाडूंना 5, बी श्रेणीतील खेळाडूंना 3 तर सी श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपेय दिले जातात.

रोहित, विराट, जडेजाव्यतिरिक्त मोहम्मद सिराजला यालाही फटका बसू शकतो. सिराज सध्या ए श्रेणीत आहे. मात्र त्याला बीसीसीआय बी श्रेणीत टाकू शकते. त्यामुळे सिराजला 2 कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

कुणाला लॉटरी?

दरम्यान बीसीसीआय काही खेळाडूंचा या वार्षिक करारात समावेश करु शकते. यामध्ये श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा या तिघांची नावं आघाडीवर आहेत. श्रेयसला गेल्या वर्षी शिस्तभंग केल्याने वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे आता या तिघांना बीसीसीआय कोणत्या श्रेणीनुसार वार्षिक करारात स्थान देणार? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप.
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.