AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final : जय शाह बोलले मग विषय संपला, त्यांचे ‘ते’ शब्द ठरले खरे, Video एकदा पाहाच

BCCI Secretary jay shah : टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह चार महिन्यांआधी जे बोलले होते अगदी तसंच काहीसं घडलं आहे. त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते जाणून घ्या.

IND vs SA Final : जय शाह बोलले मग विषय संपला, त्यांचे 'ते' शब्द ठरले खरे, Video एकदा पाहाच
| Updated on: Jun 30, 2024 | 5:56 PM
Share

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने आणि साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. सात धावांनी विजय मिळवत गेल्या टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांपासून पडलेला दुष्काळ संपवला. टीम इंडियाचं स्वप्न अधुर राहिलेलं होतं अखेर ते वर्ल्ड कपमध्ये पूर्ण झालं. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा आहे. जय शाहांनी 14 फेब्रुवारी 2024 ला एक कार्यक्रमामध्ये जे बोलले ते अगदी खरं झालं आहे. जय शाह काय म्हणाले होते जाणून घ्या.

टीम इंडियाने फायनलमध्ये विजय मिळवल्यावर बार्बाडोसच्या मैदानावर रोहित शर्माने भारताचा तिरंगा रोवला. यावेळी रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जय शाह तिथे उपस्थित होते. मात्र जय शाह यांनी याबाबत आधीच याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी जय शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी-20 वर्ल्ड कप खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. कारण टीम इंडियाचं फक्त वेळापत्रक जाहीर झालेलं होतं.

पाहा व्हिडीओ:-

 जय शाह काय म्हणाले होते?

अहमदाबादमधील फायलनमध्ये आपण सलग दहा सामने जिंकूनही वर्ल्ड कप जिंकू शकलो नव्हतो. मात्र मी तुम्हाला वचन देतो की, आगामी 2024 मधील टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलला बार्बाडोसमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा झेंडा फडकवणार असं जय शाह म्हणाले होते. जय शाह जे बोलले ते खरं ठरलं आहे. जय शाह यांचे बोलल्याप्रमाणे टीम इंडियानेही एकदम दमदार कामगिरील करत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत टी-२० वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे.

पाहा व्हिडीओ:-

e

दरम्यान, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन बड्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिन्ही  दिग्गजांनी टीम इंडियाकडून खेळणार नसल्याचं सांगत निवृत्तीची घोषणा केली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.