AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: Virat Kohli एका फॉर्मेटमधून OUT होणार? सिलेक्शन कमिटी मोठ्या निर्णयाच्या तयारीत

विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सध्या संघर्षाचा काळ आहे. त्याच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. मागच्या तीन वर्षात तो एकही शतक झळकवू शकलेला नाही.

मोठी बातमी: Virat Kohli एका फॉर्मेटमधून OUT होणार? सिलेक्शन कमिटी मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Virat kohli Image Credit source: AFP
| Updated on: Aug 30, 2022 | 10:42 AM
Share

मुंबई: विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सध्या संघर्षाचा काळ आहे. त्याच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. मागच्या तीन वर्षात तो एकही शतक झळकवू शकलेला नाही. टी 20 असो वनडे किंवा कसोटी विराट कोहली तिन्ही फॉर्मेट मध्ये झगडतोय. एकवेळ विराट कोहलीची सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बरोबर तुलना केली जायची. विराट सचिनच्या विक्रमांशी बरोबरी करेल, असं बोललं जायच. पण आता त्याच विराटच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लवकरच विराट कोहली बद्दल निवड समिती एखादा मोठा निर्णय घेऊ शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) नंतर विराट कोहली क्रिकेटच्या एका फॉर्मेट मधून बाद होऊ शकतो. टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट टी 20 फॉर्मेट मधून निवृत्ती जाहीर करु शकतो. टी 20 वर्ल्ड कप नंतर निवड समिती आणि बीसीसीआयचे पदाधिकारी या पर्यायावर चर्चा करु शकतात. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर अजूनही संघात

विराट कोहली भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर अजूनही संघात स्थान टिकवून आहे. टी 20 मध्ये त्याची खेळण्याची पद्धत फार चालत नाहीय. विराट कोहली 20 किंवा 35 धावा करतोय, पण या धावा 150 च्या स्ट्राइक रेटने होत नाहीयत. रविवारी पाकिस्तान विरुद्ध विराटने 35 धावा 102.94 च्या स्ट्राइक रेटने केल्या. टी 20 क्रिकेट मध्ये कमी चेंडूत जास्त धावा फटकावणारा फलंदाज उपयुक्त ठरतो. ते या फॉर्मेटच समीकरण आहे. विराट कोहली जो पर्यत टी 20 च्या पेसने धावा करत नाही, तो पर्यंत त्याला सूर गवसला असं म्हणता येणार नाही.

विराटच्या बाबतीत अनेकांचा अंदाज चुकला

मागच्यावर्षी विराटच्या नेतृत्वाखाली टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आला. विराटला वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. कॅप्टनशिपच्या जबाबदारीच ओझं उतरल्यामुळे तो बिनधास्त खेळ दाखवेल, धावा करेल असा अनेकांचा होरा होता. पण तो चुकला. विराटचा धावांसाठी संघर्ष सुरुच आहे. अजून एक-दोन महिने हे असंच सुरु राहिलं, तर निवड समितीने विराट बद्दल मोठा निर्णय घ्यायला अजिबात कचरणार नाही, तसे संकेत सुद्धा दिले जात आहेत. टी 20 क्रिकेट मध्ये मागच्या पाच डावात विराटने 17, 52, 1, 11 आणि 35 धावा केल्या.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.