AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma ची कॅप्टनशिप जाणार? जानेवारीत भारतीय क्रिकेटमध्ये घडणार मोठा बदल

भविष्याचा विचार करुन BCCI एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत.

Rohit Sharma ची कॅप्टनशिप जाणार? जानेवारीत भारतीय क्रिकेटमध्ये घडणार मोठा बदल
Rohit sharmaImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 14, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये झालेला पराभव भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवणार आहे. इंग्लंडकडून 10 विकेटने झालेला पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डानेही सेमीफायनलमधील पराभवाला गांभीर्याने घेतलं आहे. BCCI भारतीय क्रिकेटमध्ये काही अमूलाग्र बदल घडवण्याच्या विचारात आहे. लवकरच व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कॅप्टन दिसू शकतात.

बदल काय होणार?

व्हाइट बॉल क्रिकेट म्हणजे वनडे आणि टी 20 साठी सेप्रेट कॅप्टन. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. मायदेशात जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सीरीज होणार आहे. याच मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये बदलाची अमलबजावणी सुरु होईल. जानेवारी महिन्यात श्रीलंके विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजसाठी दोन वेगवेगळे कॅप्टन दिसतील.  रोहित शर्मा वनडे टीमच नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्या टी 20 क्रिकेट टीमचा कॅप्टन असेल.

बीसीसीआय अधिकाऱ्याने काय माहिती दिली?

“आताच वृत्ताला दुजोरा देणं थोडं घाईच ठरेल. पण वनडे आणि टी 20 टीमसाठी सेप्रेट कॅप्टन नियुक्त करण्याचा आम्ही विचार करतोय. यामुळे एकाच माणसावरचा लोड कमी होईल. टी 20 क्रिकेटसाठी एक नवा दृष्टीकोन गरजेचा आहे. 2023 मध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप आहे. त्यासाठी सातत्य सुद्धा गरजेच आहे. जानेवारीपासून योजनेवर अमलबजावणी सुरु होऊ शकते. आम्ही भेटून, या बद्दल अंतिम निर्णय घेऊ” असं टॉप बीसीसीआय अधिकाऱ्यांनी इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.

श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजनंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात मालिका आहे. जानेवारीपासून हार्दिक पंड्याची टी 20 मध्ये कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून नियुक्ती होऊ शकते. रोहित शर्मा वनडे आणि टेस्ट टीमचा नेतृत्व करेल.

वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या टीममध्ये फरक काय?

इंग्लंडने नुकताच टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या टीमच्या टेस्ट आणि टी 20 टीमचे वेगवेगळे कॅप्टन्स आहेत. टेस्टमध्ये नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे, तर मर्यादीत षटकात जोस बटलर कॅप्टन आहे. इंग्लंडची टेस्ट आणि टी 20 टीमही वेगळी आहे. टी 20 क्रिकेटमध्ये वेग महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने टीम इंडियाला आखणी करावी लागेल. टीम इंडियाने 2007 साली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी त्या टीममध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड नव्हते. युवा खेळाडूंच्या जोशने भरलेला हा संघ होता.

Follow Us
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…