AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : मॅच टाय झाल्यास कोण ठरणार विजेता? जाणून घ्या नियम

Icc Champions Trophy India vs Pakistan 2025 : टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या मोहिमेतील दुसरा सामना खेळत आहे. ही मॅच टाय झाली तर विजेता कोण आणि कसा ठरणार? जाणून घ्या

IND vs PAK : मॅच टाय झाल्यास कोण ठरणार विजेता? जाणून घ्या नियम
india vs pakistan flag
| Updated on: Feb 23, 2025 | 6:05 PM
Share

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे कायमच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. टीम इंडिया कायमच आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र समजा हा सामना टाय झाला? तर कोणत्या संघाला विजेता ठरणार? कोणत्या नियमानुसार निकाल लावला जाणार? आयसीसीचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.

कसा ठरणार विजयी संघ?

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना टाय झाला तर सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ निश्चित केला जाईल.आयसीसीच्या नियमानुसार, सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्यात येईल. तसेच सुपर ओव्हरचा जोवर निकाल लागत नाही, तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.सोप्या शब्दात सांगायतं तर पहिली सुपर ओव्हरही टाय झाली, तर पुन्हा सुपर ओव्हर होईल. हे असंच सुरु राहिल जोवर सुपर ओव्हरचा निकाल लागत नाही.

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील बाद फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत. पाऊस किंवा अन्य कारणामुळे मुख्य दिवशी सामना न झाल्यास राखीव दिवशी सामना होईल. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान 25 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. तसेच साखळी फेरीतील सामन्याचा डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल काढण्यासाठी किमान 20 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. तसेच साखळी फेरीतील सामन्याचा निकाल लागू न शकल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट दिला जातो.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.