AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World cup 2023 : 50 ओव्हर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप? क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार?

ODI World cup 2023 : यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. वनडे फॉर्मेटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल आवश्यक आहे. वनडे क्रिकेटमध्ये 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

ODI World cup 2023 : 50 ओव्हर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप? क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार?
Rohit-HardikImage Credit source: AFP
| Updated on: Mar 14, 2023 | 1:49 PM
Share

ODI World cup 2023 : क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार आहे का? वनडे क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता वनडे सामने 40 ओव्हरचे होणार? या प्रश्नांची उत्तर मिळणं सध्या कठीण आहे. पण बदलांची चर्चा जरुर सुरु झालीय. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांच्या मते, वनडे फॉर्मेटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल आवश्यक आहे. वनडे क्रिकेटमध्ये 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. शास्त्रींच्या या मताच दिनेश कार्तिकने सुद्धा समर्थन केलय.

वनडे क्रिकेट आता तेवढ आकर्षक राहिलेलं नाहीय. त्याच महत्त्व कमी होतय. यावर्षी भारतात होणार 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप शेवटचा वर्ल्ड कप ठरु शकतो. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक असं का बोलतायत? ते जाणून घेऊया.

रवी शास्त्री काय म्हणाले?

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री म्हणाले की, “वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी भविष्यात ओव्हर कमी करुन 40-40 ओव्हर्सचे सामने खेळवावेत” “1983 साली आम्ही वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी 60 ओव्हर्सच्या मॅचेस होत्या. लोकांचा रस कमी होऊ लागल्यानंतर 50 ओव्हर्सचा खेळ झाला. मला वाटतं आता, 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याची वेळ आलीय. वेळेबरोबर बदल गरजेचा आहे” असं रवी शास्त्री म्हणाले.

वनडे क्रिकेट बोरिंग?

दिनेश कार्तिकने रवी शास्त्रींच समर्थन केलं. “लोकांना टेस्ट क्रिकेट पहायच आहे. तो क्रिकेटचा उत्तम फॉर्मेट आहे. टी 20 क्रिकेट लोक मनोरंजनासाठी पाहतात. पण 50 ओव्हर्सचा खेळ बोरिंग व्हायला लागलाय. लोकांना 7 तास थांबून मॅच पाहण्याची इच्छा नाहीय” असं दिनेश कार्तिक म्हणाला. त्यामुळे कार्तिकलाही वाटतय की, भारतात होणारा 50 ओव्हर्सचा वनडे वर्ल्ड कप शेवटचा ठरेल. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांच हे म्हणण कितपत योग्य आहे आणि आयसीसी या बद्दल काय विचार करते, ते लवकरच समजेल.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.