AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळणार, राहुल द्रविड रणनितीसह सज्ज

IND vs ENG: इंग्लंडचा संघ बलाढय वाटत असला, तरी टीम इंडियाची काय बलस्थानं आहेत, ते हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितलं.

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळणार, राहुल द्रविड रणनितीसह सज्ज
Rahul Dravid-Virat kohliImage Credit source: twitter
| Updated on: Jun 30, 2022 | 11:07 AM
Share

मुंबई: एजबॅस्टन कसोटी सुरु होण्याआधी टीम इंडियाची बाजू थोडी कमकुवत वाटतेय. कारण केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे या सीरीजमध्ये खेळत नाहीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खेळण्याबद्दल सुद्धा अजूनही अनिश्चितता आहे. त्यात इंग्लंडने न्यूझीलंडच्या टीमला 3-0 ने धूळ चारली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचं पारड थोडं जड वाटतय. इंग्लंडचा नवीन कर्णधार बेन स्टोक्सने आक्रमक क्रिकेट खेळण्याचा इशारा दिला आहे. पण इंग्लंडच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा विचार, दृष्टीकोन आणि रणनिती पुरेशी आहे. इंग्लंडची टीम सध्या आपला नवीन कॅप्टन आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली नव्या पद्धतीच आक्रमक क्रिकेट खेळतेय. न्यूझीलंडला मायदेशात त्यांनी ज्या पद्धतीने धूळ चारली, त्यावरुन त्यांची आक्रमक मानसिकता दिसून आली. मालिका संपल्यानंतर भारताविरुद्ध सुद्धा आम्ही अशाच पद्धतीच क्रिकेट खेळू, असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे. राहुल द्रविड यांनी या सगळ्यावर एवढच म्हटलय, त्यांना आक्रमक क्रिकेट खेळूं दे. आम्ही आमच्या पद्धतीच क्रिकेट खेळू.

हा कसोटी सामना महत्त्वाचा का?

भारतासाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. कारण 15 वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. मागच्यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक सामना बाकी राहिला होता. आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले गेले असून भारत 2-1 ने आघाडीवर आहे. कोविडमुळे मागच्यावर्षी एक कसोटी रद्द झाली होती. तोचा सामना उद्यापासून सुरु होणार आहे.

राहुल द्रविड काय म्हणाले?

इंग्लंडचा संघ बलाढय वाटत असला, तरी टीम इंडियाची काय बलस्थानं आहेत, ते हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितलं. “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, आमची टीम खूप चांगली आहे. आम्ही सातत्याने सकारात्मक क्रिकेट खेळतोय. मागच्यावर्षी आम्ही WTC टेबल मध्ये दुसऱ्या नंबरवर होतो. आता सुद्धा आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. यातून आमचा संघ किती यशस्वी आहे, ते दिसून येतं. आम्ही 20 विकेट घेण्यास सक्षम आहोत, म्हणून आम्ही यशस्वी आहोत. माझ्यासाठी यापेक्षा अजून काही सकारात्मक असू शकत नाही” असं राहुल द्रविड म्हणाले.

Follow Us
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी.
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.