AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci Announce Prize Money For Team India : वर्ल्ड कप जिंकला, आता छप्पर फाड पैसा, डोळे विस्फारतील अशा इनामी रक्कमेची घोषणा

Bcci Announce Prize Money For Team India : दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप 2026 ला गवसणी घातली. आता बीसीसीआयकडून टीम इंडियासाठी इनामी रक्कमेची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने जे इनाम जाहीर केलय, त्याने तुमचे डोळे चमकतील.

Bcci Announce Prize Money For Team India : वर्ल्ड कप जिंकला, आता छप्पर फाड पैसा, डोळे विस्फारतील अशा इनामी रक्कमेची घोषणा
Team India
| Updated on: Mar 10, 2026 | 12:56 PM
Share

ICC मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या भारतीय टीमवर पैशांचा पाऊस सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टीम इंडियाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. अशी कामगिरी करणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. टीम इंडियाच्या या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआयकडून त्यांच्यासाठी काय घोषणा होते? त्यांना किती कोटींच पारितोषिक मिळणार? याची उत्सुक्ता होती. अखेर बीसीसीआयने आज त्या इनामी रक्कमेची घोषणा केली आहे.

बीसीसीआयकडून टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला 131 कोटी रुपये रोख रक्कमेच इनाम जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयकडून आज मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. भारताने याआधी 2007 आणि 2024 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोन-दोनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय.

अंतिम सामन्यातही तोच सिलसिला कायम

खरंतर या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यागणिक टीम इंडियाची कामगिरी सुधारत गेली. अपवाद फक्त सुपर-8 च्या पहिल्या सामन्याचा. तिथे दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात टीम इंडियाची कामगिरी उंचावत गेली. सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला नमवलं. तिथे 250 प्लस धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर वेस्ट इंडिजने दिलेलं 195 धावांचं अवघड लक्ष्य पार केलं. त्यानंतर सेमीफायनलमध्ये पुन्हा इंग्लंड विरुद्ध 250 प्लस धावा केल्या. अंतिम सामन्यातही तोच सिलसिला कायम राखत न्यूझीलंडला विजयासाठी 256 धावांचं टार्गेट दिलं होतं.

त्याच्यामुळेच सूर्यकुमार यादवला हा वर्ल्ड कप उंचावता आला

अखेरच्या तिन्ही सामन्यात संजू सॅमसनने जबरदस्त खेळ दाखवला. वेस्ट इंडिज विरुद्ध 97, इंग्लंड विरुद्ध 89 आणि न्यूझीलंड विरुद्ध 89 धावांची खेळी केली. त्याच्यामुळेच सूर्यकुमार यादवला हा वर्ल्ड कप उंचावता आला. संजू सॅमसन प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला.

Follow Us
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं