AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS :’वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विसरा आणि..’, सुनील गावस्कर यांनी कसोटीपूर्वीच कान टोचले

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. खरं तर या मालिकेपूर्वीच भारतावर दबाव वाढला आहे. ही मालिका जिंकण्यासोबत वर्ल्ड टेस्ट अंतिम फेरीचं आव्हान आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाचे कान टोचले आहेत.

IND vs AUS :'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विसरा आणि..', सुनील गावस्कर यांनी कसोटीपूर्वीच कान टोचले
| Updated on: Nov 19, 2024 | 6:28 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या साखळीतील ही शेवटची कसोटी मालिका आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका काहीही करून 4-0 ने जिंकणं भाग आहे. तरंच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठू शकतो. मात्र ऑस्ट्रेलियात असा विजय अशक्य आहे असं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. एका खासगी वाहिनीवरील चर्चेत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे अशा विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पाहणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा प्रयत्न करावा.

टीम इंडियाने 4-0 ने संभाव्य विजयाचा दावा करण्याची त्यांची इच्छा सोडली पाहिजे. अशा विजयाची अपेक्षा बाजूला ठेवून दोन-तीन सामने जिंकणे ही उल्लेखनीय कामगिरी ठरेल. टीम इंडियाने मालिका जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असे सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं. त्यामुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात अनुपस्थित आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात विजय मिळवणं आव्हान असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित खूपच कठीण आहे. कदाचित तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगू शकतं. भारताने ऑस्ट्रेलियाचा 5-0 किंवा 4-0 ने पराभव केला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल निश्चित होईल. पण या मालिकेत टीम इंडियाचा एकही पराभव परवडणारानाही. म्हणजे 5 सामन्यांच्या मालिकेत 4 विजय आणि 1 अनिर्णित राहणे अपरिहार्य आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली, तर इतर दोन्ही संघांमधील निकाल निर्णायक असेल. म्हणजे इथे इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 1 कसोटी सामना जिंकला पाहिजे. तसेच श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी अनिर्णित राहिली पाहीजे. तरच टीम इंडियाचं अंतिम फेरीचं गणित ठरेल.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना