AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षकपदी टिकणार नाही, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य, दिली तीन कारणे

gautam gambhir head coach: मी गौतम गंभीरला चांगलेच ओळखतो. त्याचा स्वभाव पहिल्यास तो जास्त दिवस भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करु शकणार नाही. त्यासाठी तीन महत्वाची कारणे आहेत.

VIDEO: गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षकपदी टिकणार नाही, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य, दिली तीन कारणे
प्रशिक्षक गौतम गंभीर
| Updated on: Aug 04, 2024 | 9:36 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती झाली. श्रीलंका दौऱ्यापासून त्याने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली. भारत-श्रीलंका दरम्यान झालेल्या T20 सीरीजमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर याला पहिलेच यश मिळाले. भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप केले. त्यामुळे गौतम गंभीर याच्या कारकिर्दीची सुरुवात यशाने झाली. त्यावेळी वर्ल्डकप विजेता भारतीय संघातील खेळाडूंचे धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. त्यानुसार, गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षक म्हणून राहू शकणार नाही. त्यासाठी त्या खेळाडूने तीन कारणेही दिली आहेत. 2007 मधील T20 वर्ल्डकप विजेता संघातील खेळाडू जोगिंदर शर्मा याने हे वक्तव्य केले आहे.

जोगिंदर शर्मा याने काय म्हटले

गौतम गंभीरसंदर्भात वक्तव्य करणारा खेळाडू 2007 मधील T20 वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य होता. विजय झालेल्या भारतीय संघातील हिरो होता. त्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीर याचा सहकारी सदस्य होता. जोगिंदर शर्मा याच्या वक्तव्यानुसार, मी गौतम गंभीरला चांगलेच ओळखतो. त्याचा स्वभाव पहिल्यास तो जास्त दिवस भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करु शकणार नाही.

जोगिंदर शर्मा याने दिली तीन कारणे

जोगिंदर शर्मा याची गौतम गंभीर संदर्भातील मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे. त्या मुलाखतीत जोगिंदर शर्मा याने तीन कारणे दिली आहे.

  1. गौतम गंभीर याचे काही निर्णय असे असतात की ते अनेकांना आवडत नाही. कारण तो सरळ बोलतो, रोखठोक बोलतो.
  2. गौतम गंभीर कोणाजवळ जात नाही. त्याला चापलूसी करणे जमत नाही. त्याची तशी सवय नाही.
  3. गौतम गंभीर आपल्या कामाशी काम ठेवतो. तसेच कधी क्रेडीट घेण्याच्या फंद्यातही पडत नाही.

राहुल द्रवीड ऐवजी गौतम गंभीर

राहुल द्रविड याच्या जागी गौतम गंभीर याने टीम इंडियात स्थान मिळवले आहे. T20 विश्वचषक 2024 मधील विजयासह राहुल द्रविडचा टीम इंडियाचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. त्यानंतर गौतम गंभीरकडे ही जबाबदारी आली. सध्या भारतीय संघ गौतम गंभीर याच्या प्रशिक्षकपदाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका सुरु आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.