AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: मोठ्या जबाबदारीआधी हार्दिक पंड्याने सुरु केली पहिल्या परीक्षेची तयारी

हार्दिक पंड्या कोचिंग स्टाफची वाट बघत बसला नाही, त्याने थेट...

Hardik Pandya: मोठ्या जबाबदारीआधी हार्दिक पंड्याने सुरु केली पहिल्या परीक्षेची तयारी
hardik pandyaImage Credit source: bcci
| Updated on: Nov 14, 2022 | 6:56 PM
Share

वेलिंग्टन: T20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभव मागे सोडून टीम इंडिया पुढे गेलीय. टीम इंडियाचा पुढचा टप्पा न्यूझीलंड विरुद्धची सीरीज आहे. इथे टीम इंडियाला वनडे आणि टी 20 मालिका खेळायची आहे. टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंना या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कप सुरु असतानाच, न्यूझीलंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली होती.

हार्दिक पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 टीमच कॅप्टन बनवण्यात आलय. टीम इंडियाने या सीरीजसाठी तयारी सुरु केलीय. सोमवारी वेलिंग्टनमध्ये त्यांनी सराव केला.

खेळाडूंचा आज जोरदार सराव

युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. टीमच अधिकृत सराव सत्र उद्या मंगळवारपासून सुरु होईल. काही खेळाडूंनी आज जोरदार सराव केला. काही खेळाडूंनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट केलेत. कोचिंग स्टाफशिवाय हार्दिकने सराव सुरु केलाय. तो मैदानात प्रचंड मेहनत घेतोय.

कोचिंग स्टाफमध्ये काय बदल?

फक्त खेळाडूच नाही, कोचिंग स्टाफलाही आराम देण्यात आलाय. मुख्य कोच राहुल द्रविड, गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना आराम देण्यात आलाय. राहुल द्रविड यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडे कोचिंगची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. साईराज बहुतुले गोलंदाजी आणि मुनीष वाली फिल्डिंग कोचची जबाबदारी संभाळणार आहेत. हे सर्व सोमवारी न्यूझीलंडमध्ये पोहोचतील. मंगळवारपासून अधिकृत सराव सत्र सुरु होईल.

न्यूझीलंडमध्ये काय असेल आव्हान?

न्यूझीलंडमधील वातावरण टीम इंडियासाठी आव्हानात्मक असेल. इथल्या विकेट्सवर ऑस्ट्रेलियाच्या विकेट्सपेक्षा चेंडू जास्त स्विंग होतो. भारतीय फलंदाजांसाठी धावा बनवणं इथे सोपं नाहीय.

T20 आणि वनडे मॅचेस किती तारखेला?

भारताला न्यूझीलंड दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची सीरीज खेळायची आहे. टी 20 सीरीजची सुरुवात 18 नोव्हेंबरपासून होईल. 20 आणि 22 नोव्हेंबरला दुसरा आणि तिसरा टी 20 सामना खेळला जाईल. त्यानंतर वनडे मालिका सुरु होईल. वनडेमध्ये शिखर धवन टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. वनडे सीरीज 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरु होईल. 27 आणि 30 नोव्हेंबरला दुसरी आणि तिसरी वनडे मॅच होईल.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?