AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौरची चिडचिड, म्हणाली….

IND vs ENG: भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने आम्ही जबरदस्ती खेळलो, असं म्हटलं आहे.

IND vs ENG: इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौरची चिडचिड, म्हणाली....
Harmanpreet-kaur
| Updated on: Sep 11, 2022 | 11:39 AM
Share

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने आम्ही जबरदस्ती खेळलो, असं म्हटलं आहे. या मॅचमध्ये 100 टक्के खेळण्यायोग्य स्थिती नव्हती, असं तिचं म्हणण आहे. भारत आणि इंग्लंडच्या महिला टीममध्ये चेस्टर ली स्ट्रीट येथे हा सामना खेळला गेला. पावसामुळे ही मॅच उशिराने सुरु झाली. पावसानंतर सामना सुरु झाला. त्यावेळी इंग्लंडने टॉस जिंकला व टीम इंडियाला फलंदाजीसाठी बोलावलं.

इंग्लंडने तेच लक्ष्य किती ओव्हरमध्ये गाठलं?

भारतीय महिला टीम मोठा स्कोर उभारु शकली नाही. त्यांनी 7 विकेट गमावून 132 धावा केल्या. इंग्लंडच्या टीमला या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अडचण आली नाही. फक्त 13 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून त्यांनी सहज हे टार्गेट गाठवलं. तीन मॅचच्या सीरीजमध्ये इंग्लंडची टीम 1-0 ने आघाडीवर आहे.

खेळण्यायोग्य परिस्थिती नव्हती

मैदान ओलं असल्यामुळे त्यावरुन घसरण्याची भिती होती. सहजतेने स्ट्रोक खेळता येतील, अशी खेळपट्टी नव्हती. टीम इंडियाला फिल्डिंग करताना अडचणी आल्या. टीमने कॅच सोडल्या व चेंडूला सुद्धा योग्य जज करु शकले नाहीत.

मी समाधानी आहे

सामन्यानंतर हरमनप्रीत कौरने या पराभवाची कारणं सांगितली. “आम्ही जितक्या धावा केल्या पाहिजे होत्या, तितक्या धावा केल्या नाहीत. मला वाटतं आज आम्ही जबरदस्ती खेळलो. कारण स्थिती 100 टक्के खेळण्यायोग्य नव्हती. मुली आज ज्या पद्धतीने खेळल्या, निश्चित त्यामुळे मी आनंदी आहे. दुखापत होण्याचा धोका होता. पण तरीही त्या खेळण्यासाठी तयार होत्या. कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करु शकणारे टीममेट्स तुम्हाला हवे असतात. आमच्या टीमने प्रयत्न केले. त्यावर मी समाधानी आहे” असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

Follow Us
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली