AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही! कुठे होणार सामने?

Icc Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे बीसीसीआयचा टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तीव्र विरोध आहे.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही! कुठे होणार सामने?
india vs pakistan cricketImage Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Oct 08, 2024 | 9:10 PM
Share

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये नियोजित आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी तीव्र विरोध आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उभयसंघात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. तसेच भारतीय संघ पाकिस्तान दौरा करत नाहीत. टीम इंडियाने गेल्या वर्षीही पाकिस्तानमध्ये आशिया कपमधील सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी म्हणून श्रीलंकेत करण्यात आलं होतं. अशात आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारचीय संघांचे सामने हे यूएईमध्ये खेळवण्यात येऊ शकतात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 15 फेब्रुवारी के 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये नियोजित करण्यात आलं आहे. त्यानुसार लाहोर,कराची आणि रावळपिंडी येथे हे सामने होणार आहेत.

‘आउटलेट दी टेलीग्राफ’च्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने हे यूएईत खेळवण्यात येऊ शकतात. तसेच टीम इंडिया फायनलमध्ये पोहचल्यास ट्रॉफीसाठीचा सामना हा दुबईत खेळवला जाऊ शकतो. तर नियोजिनानुसार चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना हा लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे. तसेच टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत करावेत, असा प्रस्ताव आहे. दुबई भारत-पाकिस्तान सीमेपासून जवळ आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियासह, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ एका गटात आहेत.

असं होणार आयोजन?

आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. मात्र टीम इंडियाचे या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने आणि फायनलचं आयोजन हे श्रीलंकेत करण्यात आलेलं. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 2012-2013 पासून द्विपक्षीय मालिका होत नाही. तसेच दोन्ही संघ हे फक्त आयसीसी स्पर्धेत आणि आशिया स्पर्धेच एकमेकांविरुद्ध खेळतात.

पीसीबी अध्यक्षांना आशा

टीम इंडिया पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येईल, अशी आशा पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी व्यक्त केली होती. तसेच टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते. आता याबाबत काय निर्णय होतो? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.