AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये कोण कमाल करणार? कोहली की रोहित? ब्रेट लीनं तिसरंच नाव सांगितलं!

आगामी टी20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने संघ जाहीर केल्यानंतर नुकताच त्यात एक बदल करत शार्दूलला मुख्य संघात घेत अक्षरला राखीवमध्ये टाकले आहे. आता या तयार संघातील कोणता खेळाडू स्पर्धेत कमाल करेल? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

T20 World Cup मध्ये कोण कमाल करणार? कोहली की रोहित? ब्रेट लीनं तिसरंच नाव सांगितलं!
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 5:11 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) आगामी टी20 विश्वचषकात (T20 Wolrd Cup) कोणता भारतीय फलंदाज कमाल करणार? याची भविष्यवाणी केली आहे. लीच्या मते सध्या खेळाडूंचा फॉर्म पाहता युवा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) टी20 विश्व चषकात (T20 World Cup 2021) कमाल करु शकतो. त्यामुळे त्याला योग्य स्थानी फलंदाजीला पाठवून विराट-रोहितवरील भार कमी करुन संघाने फायदा करु घेतला पाहिजे.

ली याला यंदा भारतीय संघ हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असेल असं वाटत आहे. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी सामन्यांना सुरुवात करणार असून पहिलाच सामना पाकिस्तान संघाशी खेळणार आहे. दरम्यान ली ‘फॉक्स स्पोटर्स’ शी बोलताना म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ हा अनुभवाच्या दृष्टीने एक ताकदवर संघ असला तरी माझ्यामते भारत हा स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे भारताला अनेक युवा खेळाडू मिळाले आहेत. यामध्ये काही वेगवानल गोलंदाज आहेतच. पण भारताची सलामी फलंदाजीही ताकदवर झाली आहे. ज्यामुळे भारत वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार आहे.’

‘केएल राहुल सर्वाधिक धावा करणार’

ली केएल राहुल बद्दल बोलताना म्हणाला, ‘राहुल टी20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने आयपीएल 2021 मध्येही सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यात यूएईत त्याने 6सामन्यात 295 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने विश्वचषकात राहुलला महत्त्वाचा फलंदाज म्हणून खेळवलं पाहिजे. ज्यामुळे त्याचं प्रदर्शन अजून सुधारेल आणि संघाला फायदा होईल.’

सूर्या आहे पुढील ‘स्टार’

लीने सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. तो म्हणाला, ‘मला वाटतं सूर्या हा भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील सुपरस्टार आहे. तसचं पुढे बोलताना तो म्हणाला, ‘मला भारतीय संघ ताकदवर वाटत असला तरी मी देशभक्त असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघच जिंकावा असं मला वाटतं. पण भारत नक्कीच फायनलपर्यंत बाजी मारेल.”

इतर बातम्या

KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले

IPL 2021: दिल्लीविरुद्ध केकेआर सामन्यात पाहायला मिळालं अजब दृश्य, तंबूत परतलेल्या शिमरॉनला पंचानी पुन्हा बोलवलं, नेमकं काय घडलं?

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!

(In T20 world cup 2021 kl rahul will play special role says brett lee)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.