AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयची धावाधाव! सामन्यापूर्वी चार खेळाडूंची तब्येत बिघडली, हॉटेलमधील खाण्याचे नमुने घेतले ताब्यात

ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी ट्वीस्ट आला. चार खेळाडूंची तब्येत बिघडल्याने धावाधाव करावी लागली. या प्रकरणी बीसीसीआयचे आजन्म उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

बीसीसीआयची धावाधाव! सामन्यापूर्वी चार खेळाडूंची तब्येत बिघडली, हॉटेलमधील खाण्याचे नमुने घेतले ताब्यात
बीसीसीआयची धावाधाव! सामन्यापूर्वी चार खेळाडूंची तब्येत बिघडली, हॉटेलमधील खाण्याचे नमुने घेतले ताब्यातImage Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 3:23 PM
Share

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात शेवटचा वनडे सामना होत आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कानपूरमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 खेळाडू अचानक आजारी पडले आहेत. खेळाडूंच्या पोटात दुखत असून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेन्री थॉर्नटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित खेळाडूंनाही रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर त्यांना पोटात संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले. ऑस्ट्रेलियन अ संघ कानपूरमधील लँडमार्क हॉटेलमध्ये राहत असन त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीसीसीआयची धावाधाव सुरु झाली असून उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

अन्न विभागाने कारवाई करून हॉटेलमधील अन्नाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “लँडमार्क हॉटेल हे कानपूरमधील सर्वोत्तम हॉटेल आहे. जर जेवणात काही कमतरता असती तर सर्व खेळाडू आजारी पडले असते. पण तसं काही झालेलं नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हॉटेलमधील दर्जेदार जेवण दिले जात आहे. सर्व खेळाडू सारखेच अन्न खात आहेत. कदाचित 2-4 खेळाडूंना इतरत्र संसर्ग झाला असेल.” दुसरीकडे, हॉटेल व्यवस्थापनाने अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू हवामान बदलामुळे आजारी पडल्याचं हॉटेल व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि महत्त्वाचा सामना सुरु आहे. या सामन्यात हेन्री थॉर्नट खेळत नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली होती. दरम्यान, भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.  शुबमन गिलच्या नेतृत्त्वात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड झाली आहे. तर 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.