AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ऋषभ पंत इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारणार होता, रोहितही तयार होता, नेमकं काय झालं? पाहा VIDEO

टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत रोहितसोबत सलामीला आला आणि त्यालाही चांगली सुरुवात झाली. भारतानं हा सामना 49 धावांनी जिंकला.

IND vs ENG: ऋषभ पंत इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारणार होता, रोहितही तयार होता, नेमकं काय झालं? पाहा VIDEO
ऋषभ पंतला पहिल्यांदा ओपनिंग करण्याची संधी मिळालीImage Credit source: social
| Updated on: Jul 10, 2022 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली :  इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऋषभ पंत रोहित शर्मासोबत सलामीला आला. पंतला प्रथमच सलामीवीर म्हणून संधी मिळाली. पंतनेही 15 चेंडूत 26 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 170 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 46 धावा करत संघाला संघर्षपूर्ण धावसंख्येपर्यंत नेले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 121 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने इंग्लंडमध्ये सलग दुसरी द्विपक्षीय T20 मालिका जिंकली आहे. कालच्या सामन्यात विराटची कामगिरी मात्र अत्यंत निराशजनक होती. त्यामुळे देखील तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, ऋषभनं थेट इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारू का असं रोहितला विचारलं आणि या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

रोहित-ऋषभमधील संवाद व्हायरल

कालच्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला आले. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली डावातील पहिले षटक टाकत होता. तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंत शॉर्ट मिडविकेटवर शॉट खेळून धावू लागला. जरी तो थेट थ्रोवर धावबाद होऊ शकला असता. यादरम्यान त्याने रोहितला सांगितले की, गोलंदाज समोर आला आहे. मी मारू का? यावर कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला, हो आणि काय. दोघांमधील संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहा

173चा स्ट्राईक रेट

173च्या स्ट्राईक रेटन केलेल्या सामन्यात इशान किशनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही . रोहित आणि ऋषभ पंत सलामीला आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.5 षटकांत 49 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पंतने 15 चेंडूत 173 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या. 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचवेळी रोहितने 20 चेंडूत 31 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 चौकार मारले. मात्र, यानंतर संघाची त्रेधा उडाली आणि धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात 61 अशी झाली.

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा T20 मध्ये सलग 14 वा विजय आहे. त्याने शेवटच्या सामन्यातच सलग 13 विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केला आहे. नवा कर्णधार झाल्यापासून रोहितने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. अशा स्थितीत त्याची नजर क्लीन स्वीपवर असेल.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.