AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ऋषभ पंत इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारणार होता, रोहितही तयार होता, नेमकं काय झालं? पाहा VIDEO

टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत रोहितसोबत सलामीला आला आणि त्यालाही चांगली सुरुवात झाली. भारतानं हा सामना 49 धावांनी जिंकला.

IND vs ENG: ऋषभ पंत इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारणार होता, रोहितही तयार होता, नेमकं काय झालं? पाहा VIDEO
ऋषभ पंतला पहिल्यांदा ओपनिंग करण्याची संधी मिळालीImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 10, 2022 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली :  इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऋषभ पंत रोहित शर्मासोबत सलामीला आला. पंतला प्रथमच सलामीवीर म्हणून संधी मिळाली. पंतनेही 15 चेंडूत 26 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 170 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 46 धावा करत संघाला संघर्षपूर्ण धावसंख्येपर्यंत नेले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 121 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने इंग्लंडमध्ये सलग दुसरी द्विपक्षीय T20 मालिका जिंकली आहे. कालच्या सामन्यात विराटची कामगिरी मात्र अत्यंत निराशजनक होती. त्यामुळे देखील तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, ऋषभनं थेट इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारू का असं रोहितला विचारलं आणि या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

रोहित-ऋषभमधील संवाद व्हायरल

कालच्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला आले. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली डावातील पहिले षटक टाकत होता. तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंत शॉर्ट मिडविकेटवर शॉट खेळून धावू लागला. जरी तो थेट थ्रोवर धावबाद होऊ शकला असता. यादरम्यान त्याने रोहितला सांगितले की, गोलंदाज समोर आला आहे. मी मारू का? यावर कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला, हो आणि काय. दोघांमधील संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहा

173चा स्ट्राईक रेट

173च्या स्ट्राईक रेटन केलेल्या सामन्यात इशान किशनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही . रोहित आणि ऋषभ पंत सलामीला आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.5 षटकांत 49 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पंतने 15 चेंडूत 173 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या. 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचवेळी रोहितने 20 चेंडूत 31 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 चौकार मारले. मात्र, यानंतर संघाची त्रेधा उडाली आणि धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात 61 अशी झाली.

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा T20 मध्ये सलग 14 वा विजय आहे. त्याने शेवटच्या सामन्यातच सलग 13 विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केला आहे. नवा कर्णधार झाल्यापासून रोहितने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. अशा स्थितीत त्याची नजर क्लीन स्वीपवर असेल.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...