AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात सरस कोण?

IND vs PAK Champions Trophy Head to Head : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. जाणून घ्या दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकलेत?

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात सरस कोण?
ind vs pakImage Credit source: Getty Images
| Updated on: Feb 18, 2025 | 10:29 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी एकूण 8 संघांनी क्वालिफाय केलं आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये आशिया खंडातील 3 देश आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. मात्र सर्वांना 23 फेब्रुवारीची प्रतिक्षा आहे. 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. उभयसंघ चॅम्पियन्स ट्रॉफीत किती वेळा आमनेसामने आले आहेत? दोघांपैकी कोण वरचढ आहे? जाणून घेऊयात.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998 पासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून दोन्ही संघ एकूण 5 वेळ आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर 3 वेळा विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने पाकिस्तानवर 2 वेळा मात केली आहे.

दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत 2004 साली आमनेसामने आले. तेव्हा पाकिस्ताने भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर 2009 साली पुन्हा एकदा पाकिस्तानने टीम इंडियावर मात केली. मात्र त्यानंतर 2013 साली भारताने साखळी फेरीत पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ 2017 साली 2 वेळा आमनेसामने आले होते. भारताने पाकिस्तानचा साखळी फेरीत 124 धावांनी धु्व्वा उडवला होता. मात्र अंतिम फेरीत पाकिस्तानने पलटवार करत टीम इंडियाचा धुव्वा उडवला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरंलं होतं. पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारतावर 180 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात कोण विजयी होतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....