AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारताला पहिल्या पराभवानंतर Wtc Final मध्ये पोहचण्याची किती संधी?

Team India WTC 2027 final scenarios: भारताला विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकूण 2 वेळा टेस्ट वर्ल्ड कप ट्ऱॉफीने हुलकावणी दिलीय. त्यामुळे भारताचा चौथ्या साखळीत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.

IND vs SA : भारताला पहिल्या पराभवानंतर Wtc Final मध्ये पोहचण्याची किती संधी?
Team India Wtc 2027 Final ScenariosImage Credit source: PTI
| Updated on: Nov 17, 2025 | 7:22 PM
Share

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर टीम इंडियाला पराभवासह दुहेरी झटका बसला. टीम इंडियाचं या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये नुकसान झालं आहे. टीम इंडियाची एका पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. या एका पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशीप फायनलमध्ये खेळण्याचं समीकरण बिघडलं आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडिया अंतिम फेरीसाठी कशी पात्र ठरु शकते? हे आपण समजून घेऊयात.

भारताने आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत एकूण 2 मालिका खेळल्या आहेत. भारताने इंग्लंड विरुद्ध 5 तर वेस्ट इंडिया विरुद्ध 2 सामने खेळले आहेत. भारताने या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताला 2 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना अनिर्णित राहिलाय. तर भारताला या स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात पराभूत केलं. त्यामुळे भारताचा या साखळीतील हा एकूण तिसरा पराभव ठरला आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आणखी 1 सामना खेळायचा आहे. त्यानंतर टीम इंडिया एकूण 3 मालिका खेळणार आहे. भारताला अशाप्रकारे एकण या साखळीत एकूण 10 सामने खेळायचे आहेत. भारतासमोर उर्वरित 3 मालिकांमध्ये कोणत्या 3 संघांचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.

3 संघ आणि 9 सामने

टीम इंडिया उर्वरित 3 पैकी सलग 2 मालिका या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध त्यांच्या घरात खेळणार आहे. तर टीम इंडिया या साखळीतील आपली सहावी आणि शेवटची मालिका मायदेशात खेळणार आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेनंतर थेट ऑगस्ट 2026 मध्ये आपली चौथी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध एकूण 2 सामने खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात 2 सामने खेळणार आहे. तर सहाव्या आणि शेवटच्या मालिकेत टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामने खेळणार आहे.

अंतिम फेरीचं समीकरण

टीम इंडियाने आतापर्यंत सलग आणि एकूण 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. मात्र दोन्ही वेळेस भारताचा पराभव झालाय. मात्र टीम इंडिया तिसऱ्या साखळीत अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. त्यामुळे भारताचा चौथ्या साखळीत अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी भारताला उर्वरित एकूण 10 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागणार आहेत. भारताने 7 सामने जिंकल्यानंतर 136 पॉइंट्स होतील. तसेच विजयी टक्केवारी 62.96 इतकी होईल. मात्र भारताला उर्वरित 3 पैकी 2 मालिकांसाठी विदेशात जायचं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या दोन्ही मालिका आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!