
आशिया कप स्पर्धेसाठी बहुप्रतिक्षीत भारतीय संघाची अखेर निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करताना काही नाव आश्चर्यचकीत करणारी होती. तर काही नावं अपेक्षित होती. शुबमन गिलचं टी20 संघात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुबमन गिल श्रीलंका टी20 मालिकेत उपकर्णधार होता. दुसरीकडे, या संघात जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नसल्याचं सांगण्यात येत होतं. दुसरीकडे, त्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. पण आता त्याची संघात निवड झाल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. 15 खेळाडूंची निवड करताना या संघातील 5 महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात.
🚨 #TeamIndia‘s squad for the #AsiaCup 2025 🔽
Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana,…
— BCCI (@BCCI) August 19, 2025