AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : शुबमन गिलकडे टी20 संघाची मोठी जबाबदारी, आगरकर म्हणाला..

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियात या स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेसाठी शुबमन गिलचं संघात पुनरागमन झालं आहे. तसेच त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आलं आहे.

Asia Cup 2025 : शुबमन गिलकडे टी20 संघाची मोठी जबाबदारी, आगरकर म्हणाला..
Asia Cup 2025 : शुबमन गिलकडे टी20 संघाची मोठी जबाबदारी, आगरकर म्हणाला..Image Credit source: PTI
| Updated on: Aug 19, 2025 | 3:12 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघ कसा असेल याची खलबतं सुरु होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. कोणाला संघात स्थान मिळेल? कोणाला डावललं जाईल? याबाबत चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा पडला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. शुबमन गिलचं टी20 संघात पुनरागमन झालं आहे. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 नंतर त्याच्या खांद्यावर या फॉर्मेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी पडेल असं आता क्रीडाप्रेमी सांगत आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी हाच संघ जवळपास असण्याची शक्यता आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे हाच संघ आता वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल. यात फार तर एखाद दुसरा बदल होऊ शकतो. गिलने टीम इंडियासाठी 21 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 30 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या काही भारतीय फलंदाजांपैकी एक आहे.

शुबमन गिलची संघात निवड का करण्यात आली आहे? या प्रश्नावर आगरकर म्हणाला की, “त्याने आमच्या सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत.” 25 वर्षीय गिलने ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याचा सातत्यपूर्ण चांगला फॉर्म पाहून त्याला पुन्हा टी20 संघात स्थान मिळालं आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.  भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर 14 सप्टेंंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा, रिंकू सिंग.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.