AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, महाराष्ट्राकडून खेळताच ठोकलं दमदार शतक

बुची बाबू स्पर्धेचा थरार सुरु असून दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने शतकी खेळी केली. गेल्या काही दिवसापासून मोठ्या खेळीसाठी आतुर होता. कारण टीम इंडियात संधी मिळवायची असेल तर मोठी खेळी अपेक्षित होती. अखेर त्याला यात यश आलं आहे.

पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, महाराष्ट्राकडून खेळताच ठोकलं दमदार शतक
पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, महाराष्ट्राकडून खेळताच ठोकलं दमदार शतकImage Credit source: AFP
| Updated on: Aug 19, 2025 | 2:48 PM
Share

पृथ्वी शॉ हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. देशांतर्गत क्रिकेट असो की आयपीएल या स्पर्धेतून त्याचा पत्ता कट झाला होता. कारण त्याला सूर गवसत नव्हता. त्यात त्याच्या फिटनेसचा मुद्दा गाजला होता. त्याला रणजी स्पर्धेतून डावललं होतं. असं सर्व घडत असताना पृथ्वी शॉने मुंबईला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्रकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. बुची बाबू स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचा संघ अडचणीत असताना त्याची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने 14 चौकार आणि एक षटकार मारत 122 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीनंतरही महाराष्ट्र संघ अडचणीत आहे. कारण फार काही धावा झालेल्या नाही. कारण महाराष्ट्राने सुरुवात चांगली केली पण 4 विकेट झटपट गमवल्या.

पृथ्वी शॉने पहिल्या विकेटसाठी सचिन धससोबत 71 धावांची भागीदारी केली. सचिन धस 10 धावा करून बाद झाला. सचिन बाद झाल्यानंतर 15 धावांच्या आत 3 गडी तंबूत गेल्या. महाराष्ट्राची 71 वर 1 विकेट अशी स्थिती होती. पण 84 धावांवर 4 विकेट तंबूत अशी स्थिती झाली. ऋतुराज गायकवाड 1, सिद्धेश वीर 4 आणि अंकित बावने खातं न खोलताच बाद झाला.  पृथ्वी शॉ एका बाजूने खिंड लढवत होता. त्याला सिद्धार्थ म्हात्रेची साथ मिळाली. या दोघांनी चांगली खेळी केली आणि महाराष्ट्राचा स्कोअर 140 पार नेला. सिद्धार्थ 21 धावा करून बाद झाला. त्यामुळे महाराष्ट्राची 5 विकेट गमवून 143 अशी स्थिती झाली. अजूनही छत्तीसगडपेक्षा 109 धावांनी पिछाडीवर आहे.

पृथ्वी शॉने का सोडली मुंबईची साथ?

पृथ्वी शॉला जूनमध्ये टीम बदलण्यासाठी मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं होतं. तेव्हा पृथ्वी शॉने सांगितलं होतं की, ‘माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला विश्वास आहे की महाराष्ट्र संघात सामील झाल्यामुळे मला एक क्रिकेटपटू म्हणून आणखी वाढण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभारी आहे.’

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.