विराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग

| Updated on: Jun 17, 2021 | 4:10 PM

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा देत काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत.

विराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग
harbhajan singh on wtc final
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगही (Harbhajan Singh) या सामन्याबाबत बराच उत्सुक असून त्याने संघाला शुभेच्छा देत कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा’ असा भावनिक संदेश दिला आहे. सोबतच हरभजनने सामन्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत भारतीय संघाला काही सल्ले दिले आहेत. (India has to Win ICC World Test Championship and Bring WTC Final Trophy to home says Harbhajan Singh to Virat Kohli)

हरभजनने भारतीय संघाकडे असणारे गोलंदाज सध्या संघाची ताकद असल्याचं सांगितलं. हरभजनच्या मते दोन स्पिनर खेळवणे भारताला फायद्याचे ठरु शकते. त्याने कर्णधार विराट कोहलीला तसा सल्लाही दिला. दरम्यान भारताने अंतिम 15 मध्ये दोन फिरकीपटूंना संधी याआधीच दिली आहे. परंतू अंतिम 11 मध्ये मैदानावर दोघांनाही उतरवेल का? याबाबत साशंकता आहे.

साऊदम्पटनचं मैदान आणि फिरकीपटू

हरभजनने अंतिम सामन्यात फिरकीपटूंच महत्त्व सांगताना मैदानाच्य खेळपट्टीचे उदाहरण दिले. त्याच्या मते भारताने रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) अशा दोन्ही फिरकीपटूंना खेळवणे भारतासाठी फायद्याचे ठरेल. कारण याआधी भारत 2014 आणि 2018 मध्ये याच मैदानात इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा इंग्लंडच्या मोईन अलीने 2014 मध्ये  8 आणि 2018 मध्ये 9 विकेट्स चटकावल्या होत्या. ज्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता. हे उदाहरण देत फिरकीपटूंचे महत्त्व पटवून दिले. सोबतच जाडेजा हा बोलिंगसह बॅटिंगमध्येही संघाला फायदेशीर असल्याचं हरभजन म्हणाला.

‘इशांतच्या जागी सिराजला संधी द्यावी’

सध्या भारतीय संघाकडे गोलंदाजाची फौज असल्याने अंतिम 11 मध्ये कोणाला खेळवायचे हा प्रश्न आहे. प्रत्येकजण आपआपला तर्क लावत असून हरभजनने त्याच्या मते जाडेजा आणि आश्विनसह जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी (Mohammad  Shami) यांना खेळवावे. इशांतच्या जागी सिराजला खेळवण्याबद्दल हरभजन म्हणाला, ‘इशांत शर्माने देशाची खूप सेवा केलीय. तो देशासाठी 100 टेस्ट मॅच खेळला आहे. पण आता सिराजची वेळ आली आहे. तोही फॉर्ममध्ये आहे. त्याला बोलिंग करताना पाहणं, वेगळं असेल’

‘हा विजय एखाद्या दागिन्याप्रमाणे असेल’

भारतीय संघासह विराटला शुभेच्छा देताना हरभजन म्हणाला, ”कोणत्याही फॉरमॅटमध्ये पहिल्यांदा एखादा संघ वर्ल्ड चॅम्पियन बनतो तेव्हा त्यावेळच्या फिलिंग खूप खास असतात. विराटने जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जर विराटसेनेने जिंकला तर येणाऱ्या कित्येक पिढींना ते भूषणावह असणार आहे. माझ्या शुभेच्छा विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघासोबत आहेत. विराट तू जेव्हा भारतात येशील तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊनच ये” सध्या कोरोनाच्या संकटामुळे भारतातूनच घरी बसून संघाला सपोर्ट करत असल्याचंही हरभजनने सांगितलं.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(India has to Win ICC World Test Championship and Bring WTC Final Trophy to home says Harbhajan Singh to Virat Kohli)