AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला कोण जबाबदार? समजून घ्या 4 पॉइंट्समधून

IND vs ENG: टीम इंडियाचा इतका दारुण पराभव कसा झाला, जाणून घ्या.

IND vs ENG: T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला कोण जबाबदार? समजून घ्या 4 पॉइंट्समधून
Rohit-sharmaImage Credit source: AFP
| Updated on: Nov 10, 2022 | 4:59 PM
Share

एडिलेड: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडून कोट्यवधी चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण नेहमी होतं, तसच घडलं. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा अत्यंत दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने मोठा विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी मेलबर्नवर इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल खेळली जाईल.

इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. कॅप्टन जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. भारताच्या पराभवाची काय कारण आहेत? ते जाणून घेऊया.

टीम इंडियाची ओपनिंग पार्टनरशिप सुपर 12 मध्ये अपयशी ठरली होती. सेमीफायनलमध्येही हे चित्र बदललं नाही. इंग्लंड विरुद्ध रोहित-राहुलची जोडी 9 रन्सवर आऊट झाली. टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. पावरप्लेमध्ये फक्त 38 धावा झाल्या.

कॅप्टन रोहित शर्माची बॅट संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये तळपली नाही. सेमीफायनलमध्येही हेच दृश्य होतं. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या. आज सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 14 रन्सवर आऊट झाला.

सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमारने सेमीफायनलमध्ये निराश केलं. दोघं पावरप्लेमध्ये ना विकेट घेऊ शकले. ना धावा रोखल्या. भुवनेश्वरचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा जास्त होता. शमी, अश्विन आणि पंड्याचा प्रति ओव्हर इकॉनमी रेट 10 पेक्षा जास्त होता.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चं सिलेक्शन सुद्धा पराभवाच कारण ठरलं. विकेट टेकिंग स्पिनरला संधी दिली नाही. अक्षर पटेलला संधी दिली. पण तो फ्लॉप ठरला. युजवेंद्र चहलला संपूर्ण स्पर्धेत खेळवलं नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.