AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार

यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार
team india
| Updated on: Jul 22, 2022 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली: यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला होता. यंदा किताब जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मुख्य टी 20 वर्ल्ड कप आधी संघ व्यवस्थापनाला तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवायची नाहीय.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत खेळणार टी 20 मालिका

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळेल. त्यानंतर तितक्याच सामन्यांची टी 20 मालिका होईल. 20 सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मोहाली मध्ये खेळला जाईल. त्यानंतर 23 सप्टेंबरला दुसरा सामना नागपूर आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद मध्ये होईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळेल. सीरीजचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे, दुसरा सामना 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूर मध्ये होईल. टी 20 सीरीज नंतर वनडे मालिका होईल.

एकाच वेळी दोन सीरीज खेळणार भारत

टी 20 वर्ल्ड कप साठी निवडले जाणारे खेळाडू वनडे सीरीज मध्ये दिसणार नाहीत. ही सीरीज सुरु होईपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला असेल. आमच्याकडे एकाचवेळी दोन मजबूत संघ आहेत, असं सचिव जय शाह यांनी आधीच सांगितलं होतं, बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला हे सांगितलं. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज तेव्हा खेळली जाणार, जेव्हा एक संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असेल.

कोलकाताऐवजी दिल्ली मध्ये शेवटची वनडे

वनडे सीरीज मधला शेवटचा सामना कोलकाता मध्ये खेळवायची योजना होती. पण असं होऊ शकलं नाही. रोटेशन पॉलिसीनुसार, शेवटची वनडे कोलकाता मध्ये होणार होती. पण दुर्गा पूजा असल्याने बंगाल क्रिकेट संघ सणाच्यावेळी सुरक्षा देऊ शकणार नाही. म्हणूनच दिल्ली मध्ये हा सामना खेळवण्यात येईल.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप