AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार

यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार
team india
| Updated on: Jul 22, 2022 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली: यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला होता. यंदा किताब जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मुख्य टी 20 वर्ल्ड कप आधी संघ व्यवस्थापनाला तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवायची नाहीय.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत खेळणार टी 20 मालिका

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळेल. त्यानंतर तितक्याच सामन्यांची टी 20 मालिका होईल. 20 सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मोहाली मध्ये खेळला जाईल. त्यानंतर 23 सप्टेंबरला दुसरा सामना नागपूर आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद मध्ये होईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळेल. सीरीजचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे, दुसरा सामना 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूर मध्ये होईल. टी 20 सीरीज नंतर वनडे मालिका होईल.

एकाच वेळी दोन सीरीज खेळणार भारत

टी 20 वर्ल्ड कप साठी निवडले जाणारे खेळाडू वनडे सीरीज मध्ये दिसणार नाहीत. ही सीरीज सुरु होईपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला असेल. आमच्याकडे एकाचवेळी दोन मजबूत संघ आहेत, असं सचिव जय शाह यांनी आधीच सांगितलं होतं, बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला हे सांगितलं. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज तेव्हा खेळली जाणार, जेव्हा एक संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असेल.

कोलकाताऐवजी दिल्ली मध्ये शेवटची वनडे

वनडे सीरीज मधला शेवटचा सामना कोलकाता मध्ये खेळवायची योजना होती. पण असं होऊ शकलं नाही. रोटेशन पॉलिसीनुसार, शेवटची वनडे कोलकाता मध्ये होणार होती. पण दुर्गा पूजा असल्याने बंगाल क्रिकेट संघ सणाच्यावेळी सुरक्षा देऊ शकणार नाही. म्हणूनच दिल्ली मध्ये हा सामना खेळवण्यात येईल.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत