AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार

यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

T 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दोन देशांविरुद्ध सीरीज खेळणार, BCCI कडून प्लान तयार
team india
| Updated on: Jul 22, 2022 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली: यावर्षी ऑस्ट्रेलियात (Austraila) होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (SA vs AUS) वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला होता. यंदा किताब जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मुख्य टी 20 वर्ल्ड कप आधी संघ व्यवस्थापनाला तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवायची नाहीय.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत खेळणार टी 20 मालिका

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळेल. त्यानंतर तितक्याच सामन्यांची टी 20 मालिका होईल. 20 सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये टी 20 सीरीजचा पहिला सामना मोहाली मध्ये खेळला जाईल. त्यानंतर 23 सप्टेंबरला दुसरा सामना नागपूर आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद मध्ये होईल. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळेल. सीरीजचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे, दुसरा सामना 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूर मध्ये होईल. टी 20 सीरीज नंतर वनडे मालिका होईल.

एकाच वेळी दोन सीरीज खेळणार भारत

टी 20 वर्ल्ड कप साठी निवडले जाणारे खेळाडू वनडे सीरीज मध्ये दिसणार नाहीत. ही सीरीज सुरु होईपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला असेल. आमच्याकडे एकाचवेळी दोन मजबूत संघ आहेत, असं सचिव जय शाह यांनी आधीच सांगितलं होतं, बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला हे सांगितलं. म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज तेव्हा खेळली जाणार, जेव्हा एक संघ टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असेल.

कोलकाताऐवजी दिल्ली मध्ये शेवटची वनडे

वनडे सीरीज मधला शेवटचा सामना कोलकाता मध्ये खेळवायची योजना होती. पण असं होऊ शकलं नाही. रोटेशन पॉलिसीनुसार, शेवटची वनडे कोलकाता मध्ये होणार होती. पण दुर्गा पूजा असल्याने बंगाल क्रिकेट संघ सणाच्यावेळी सुरक्षा देऊ शकणार नाही. म्हणूनच दिल्ली मध्ये हा सामना खेळवण्यात येईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.